शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

Ratnagiri: महामार्ग चौपदरीकरणातील चुकांमुळे अपघात वाढले, खेड तालुक्यात नवे ब्लॅक स्पॉट तयार झाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 18:13 IST

उपाययोजनाच नाहीत

खेड : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होताना अवघड आणि धोकादायक वळणे काढून टाकली जाणे अपेक्षित होते. मात्र ती तशीच राहून आणखीही काही नवे ब्लॅक स्पॉट तयार झाले आहेत. दुर्दैवाने यामध्ये खेड तालुक्यातील भाेस्ते घाट आणि जगबुडी नदीवरील पूल अशा दोन ठिकाणांचा समावेश आहे. भोस्ते घाटात गेल्या वर्ष / दीड वर्षात १०० हून अधिक अपघात झाले आहेत तर जगबुडी नदीवरून पुलावर आतापर्यंत सातपेक्षा अधिक मोठे अपघात झाले आहेत.खवटी ते धामणदेवी या सुमारे ४४ कि.मी.च्या चौपदरीकरणात अनेक ठिकाणी महामार्गाचे निकष न पाळताच केवळ रुंदीकरण करण्यात आले आहे. या ४४ कि.मी. च्या टप्प्यात केवळ ३ उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. यातील एक पूल भरणे नाका येथे असून या पुलाचे टोक या जगबुडी पुलावर येऊन मिळते याच ठिकाणी उड्डाणपुलाचा सर्व्हिस रोडही येऊन मिळतो.या अरुंद भागात वळण असल्यामुळे मुंबईकडून उड्डाण पुलावरून वेगाने येणारी वाहने अनियंत्रित होऊन सातत्याने अपघात घडत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. यापूर्वी टँकर, ट्रक ट्रेलर यासारख्या अवजड वाहनांचे अपघात झाले आहेत. एका अपघातात ट्रक चालक समोरील काचेतून नदीत पडला होता. पुलाच्या उजव्या बाजूला असलेली संरक्षक भिंत तुटली असून, त्यामुळेच सोमवारी पहाटे कार थेट नदीपात्रात कोसळली असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले.

उपाययोजनाच नाहीत

  • महामार्गाचा आराखडा तयार करताना यामध्ये गंभीर दोष असल्याचे भोस्ते घाटातही सिद्ध झाले आहे.
  • तीव्र उतार व वळण असलेल्या ठिकाणी गेल्या काही वर्षांच्या कालावधीत शेकडो किरकोळ व गंभीर अपघात झाले आहे.
  • या वळणावर मोठे कंटेनर व ट्रेलर, ट्रक, खासगी आरामबसचे अपघात वारंवार झाले आहेत.
  • मात्र या गंभीर विषयावर ठेकेदार कंपनी किंवा महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंते यापैकी कोणीही ठोस उपाययोजना करण्याच्या विचारातच नाहीत.

दोन पूल एकत्र येतात तेथे..

  • महामार्ग चौपदरीकरणाच्या आराखड्यात हे दोन्ही नवीन पूल बांधताना वाहनांचा वेग लक्षात घेऊन त्या पुलांचे जोडरस्ते शास्त्रीय परिमाणात बांधणे आवश्यक होते. मात्र याकडे त्यावेळी पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
  • मात्र किमान याठिकाणी सातत्याने होत असलेले अपघात लक्षात घेऊन महामार्ग बांधकाम विभागाने ठेकेदार कंपनीला अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करून घेण्यात भाग पाडणे गरजेचे होते. त्याकडे लक्ष न दिल्याने आतापर्यंत अनेक अपघात झालेत आणि बळीही गेले आहेत.

१०० हून अधिक अपघात भोस्ते घाटात गेल्या वर्ष / दीड वर्षात झाले आहेत तर जगबुडी नदीवरून पुलावर आतापर्यंत सातपेक्षा अधिक मोठे अपघात झाले आहेत

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गAccidentअपघातDeathमृत्यू