शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

Ratnagiri: महामार्ग चौपदरीकरणातील चुकांमुळे अपघात वाढले, खेड तालुक्यात नवे ब्लॅक स्पॉट तयार झाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 18:13 IST

उपाययोजनाच नाहीत

खेड : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण होताना अवघड आणि धोकादायक वळणे काढून टाकली जाणे अपेक्षित होते. मात्र ती तशीच राहून आणखीही काही नवे ब्लॅक स्पॉट तयार झाले आहेत. दुर्दैवाने यामध्ये खेड तालुक्यातील भाेस्ते घाट आणि जगबुडी नदीवरील पूल अशा दोन ठिकाणांचा समावेश आहे. भोस्ते घाटात गेल्या वर्ष / दीड वर्षात १०० हून अधिक अपघात झाले आहेत तर जगबुडी नदीवरून पुलावर आतापर्यंत सातपेक्षा अधिक मोठे अपघात झाले आहेत.खवटी ते धामणदेवी या सुमारे ४४ कि.मी.च्या चौपदरीकरणात अनेक ठिकाणी महामार्गाचे निकष न पाळताच केवळ रुंदीकरण करण्यात आले आहे. या ४४ कि.मी. च्या टप्प्यात केवळ ३ उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. यातील एक पूल भरणे नाका येथे असून या पुलाचे टोक या जगबुडी पुलावर येऊन मिळते याच ठिकाणी उड्डाणपुलाचा सर्व्हिस रोडही येऊन मिळतो.या अरुंद भागात वळण असल्यामुळे मुंबईकडून उड्डाण पुलावरून वेगाने येणारी वाहने अनियंत्रित होऊन सातत्याने अपघात घडत असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे. यापूर्वी टँकर, ट्रक ट्रेलर यासारख्या अवजड वाहनांचे अपघात झाले आहेत. एका अपघातात ट्रक चालक समोरील काचेतून नदीत पडला होता. पुलाच्या उजव्या बाजूला असलेली संरक्षक भिंत तुटली असून, त्यामुळेच सोमवारी पहाटे कार थेट नदीपात्रात कोसळली असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले.

उपाययोजनाच नाहीत

  • महामार्गाचा आराखडा तयार करताना यामध्ये गंभीर दोष असल्याचे भोस्ते घाटातही सिद्ध झाले आहे.
  • तीव्र उतार व वळण असलेल्या ठिकाणी गेल्या काही वर्षांच्या कालावधीत शेकडो किरकोळ व गंभीर अपघात झाले आहे.
  • या वळणावर मोठे कंटेनर व ट्रेलर, ट्रक, खासगी आरामबसचे अपघात वारंवार झाले आहेत.
  • मात्र या गंभीर विषयावर ठेकेदार कंपनी किंवा महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंते यापैकी कोणीही ठोस उपाययोजना करण्याच्या विचारातच नाहीत.

दोन पूल एकत्र येतात तेथे..

  • महामार्ग चौपदरीकरणाच्या आराखड्यात हे दोन्ही नवीन पूल बांधताना वाहनांचा वेग लक्षात घेऊन त्या पुलांचे जोडरस्ते शास्त्रीय परिमाणात बांधणे आवश्यक होते. मात्र याकडे त्यावेळी पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
  • मात्र किमान याठिकाणी सातत्याने होत असलेले अपघात लक्षात घेऊन महामार्ग बांधकाम विभागाने ठेकेदार कंपनीला अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करून घेण्यात भाग पाडणे गरजेचे होते. त्याकडे लक्ष न दिल्याने आतापर्यंत अनेक अपघात झालेत आणि बळीही गेले आहेत.

१०० हून अधिक अपघात भोस्ते घाटात गेल्या वर्ष / दीड वर्षात झाले आहेत तर जगबुडी नदीवरून पुलावर आतापर्यंत सातपेक्षा अधिक मोठे अपघात झाले आहेत

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गAccidentअपघातDeathमृत्यू