शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

अटी-शर्ती ठेवून मंदिरे खुली करण्यास परवानगी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे एप्रिलपासून मंदिरे बंद आहेत. तिसऱ्या लाटेची असलेली भीती व दुसरी लाट ओसरताना, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे एप्रिलपासून मंदिरे बंद आहेत. तिसऱ्या लाटेची असलेली भीती व दुसरी लाट ओसरताना, कोरोनाबाधितांची कमी, अधिक होत असलेली संख्या एकूणच कोरोना संक्रमण वाढू नये, यासाठी मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यास शासनाकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही; मात्र मंदिरे खुली करण्याबाबत विविध पक्षांची मतेही भिन्न आहेत. कोरोनामुळे शासकीय नियमावलीसह काही अटी, शर्ती ठेवून मंदिरे खुली करण्यास परवानगी देण्यात यावी, असे मत बहुतांश भाविक व्यक्त करीत आहेत.

लगतच्या केरळ राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आपल्याकडेही ही संख्या वाढण्याचा धोका आहे. जनतेच्या आरोग्य सुरक्षेसाठी शासनाकडून अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. गतवर्षी दिवाळीनंतर मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली होती. भाजपाकडून मंदिरे खुली करण्यासाठी राज्यात घंटानाद आंदोलन सुरू आहे. जनतेच्या आरोग्य सुरक्षेसाठी मंदिरे तूर्तास खुली करू नये, असेही काही राजकीय नेत्यांचे मत असले तरी काही मात्र नियमावली जारी करून मंदिरे खुली करण्यास हरकत नसल्याचे सांगत आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आहे. जनतेच्या आरोग्य सुरक्षेमुळेच शासनाने मंदिरे अद्याप खुली केलेली नाहीत. लगतच्या केरळ राज्यात कोरोनाने पुन्हा उसळी मारली असून आपल्याकडे पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही. कोरोनाचे संक्रमणाचे प्रमाण कमी झालेनंतर अंदाज घेऊनच योग्य तो निर्णय घेण्यात यावा.

- मिलिंद कीर, माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

अनलॉकमध्ये बहुतांश व्यवहार खुले करण्यात आले आहेत. भाविकांच्या भावनांचा आदर ठेवत मंदिरे खुली करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. त्यासाठी अटी-शर्थी ठेवण्यास हरकत नाही. सोशल डिस्टन्सिंग ठेवत धार्मिक पूजा, दर्शनासाठी मंदिरे खुली करावीत. दूरदृष्टीने नियोजन करून आरोग्य सुविधा अपडेट ठेवाव्यात.

- ॲड. दीपक पटवर्धन, जिल्हाध्यक्ष (दक्षिण) भाजपा.

धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबत भाविकांच्या भावना नक्कीच महत्त्वपूर्ण आहेत; परंतु आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिरे बंद राहणे योग्य आहे. शासनाने अनलॉकमध्ये विविध व्यवहार सुरू केले असताना होणारी गर्दी अभिप्रेत आहे. धार्मिक स्थळे सुरू केल्यावर होणारी गर्दी व कोरोना संक्रमणाचा धोका आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

- विलास चाळके, जिल्हा प्रमुख शिवसेना

कोरोनामुळे धार्मिक स्थळे अद्याप बंद आहेत; मात्र सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे धार्मिक स्थळांमध्ये प्रार्थना, पूजेसाठी जाणाऱ्या भाविकांना काही नियमावली निश्चित करून धार्मिक स्थळे खुली करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. सोशल डिस्टन्सिंग ठेवत धार्मिक स्थळेही खुली करावीत.

- हारीस शेकासन, जिल्हाध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग.

उत्पन्नावर परिणाम

गेल्या वर्षी आठ महिने त्यानंतर यावर्षी अद्याप पाच महिने मंदिरे बंद असल्याने मंदिरांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. मंदिराबाहेर पूजा व अन्य साहित्य विक्री करणारे व्यावसायिकही संकटात आहेत.

भाविकांची ये-जा सुरू असते, त्यावेळीच मंदिराला आर्थिक उत्पन्न प्राप्त होते; परंतु गेले वर्षभर मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंदिरांच्या उत्पन्नात घट झाली आहे.

कोरोना संसर्ग कमी झाला आहे. स्थानिक नियमावली जाहीर करून जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांना मंदिरे खुली करण्यासाठी परवानगी द्यावी. मंदिरे बंद असल्याने देखभाल दुरूस्ती, पुजारी मानधनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पूजा साहित्य विक्री व्यवसाय ठप्प झाला आहे.

- रवींद्र सुर्वे, अध्यक्ष श्रीदेव- भैरी देवस्थान रत्नागिरी.

अनलॉकमध्ये टप्प्याटप्प्याने व्यवहार खुले करण्यात आले आहेत. वर्षभर मंदिरे बंद आहेत. त्यामुळे मंदिरांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. कर्मचारी, पुजारी वेतन असो, विजेची बिले, अन्य देखभाल दुरूस्ती खर्च भागविणे अवघड झाले आहे. शासनाने नियमावली ठेवून मंदिरे खुली करण्यासाठी परवानगी द्यावी.

- विनायक राऊत,

विश्वस्त, श्री क्षेत्र गणपतीपुळे.