शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित जागांसाठी पक्षांच्या दाही दिशा

By admin | Updated: April 3, 2015 00:46 IST

राजकारण तापले : निवडणुक, पोटनिवडणुकीतून शक्ती दाखवणार

राजापूर : तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक तर ११ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली असून, सर्वच पक्षीय आपापले उमेदवारी अर्ज सादर करण्यात गुंतले आहेत. ७ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून आरक्षित प्रभागातील उमेदवारांसहित महिलांची शोध मोहीम जोरात सुरु आहे. तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पाडण्याच्यादृष्टीने तयारी सुरु आहे.तालुक्यात एकूण १०१ ग्रामपंचायती असून, त्यापैकी ५० टक्के म्हणजे ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका या महिन्यात पार पडत आहेत. त्यामध्ये शिवणे खुर्द, गोवळ, धोेश्वर, शीळ, ओणी, कोंडीवळे, कोदवली, देवाचे गोठणे, चिखलगाव, चुनाकोळवण, मंदरुळ, हातदे, करक, पांगरी खुर्द, हरळ, कारवली, येरडाव, मिळंद, जवळेथर, काजिर्डा, कोळंब, फुफेरे, ओशिवळे, सौंदळ, कशेळी, सोलगाव, आंबोळगड, वाडापेठ, कोंडसर बु., उन्हाळे, मोरोशी, पन्हळेतर्फे सौंदळ, वालये, पांगरे बु., दोनिवडे, ससाळे, महाळुंगे, तळगाव, मोसम, अणसुरे, निवेली, दळे, कुवेशी, कुंभवडे, तारळ, पडवे यांचा समावेश आहे तर देवाचे गोठणे, कोतापूर, वडवली, खरवते, वडदहसोळ, पडवे, कोळवणखडी, आंगले, साखरीनाटे, मोगरे व कोंड्येतर्फे सौंदळ अशा ११ ग्रामपंचायती अंतर्गत पोटनिवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे तालुक्यात ६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत.
या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून ७ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत, तर २२ एप्रिलला मतदान पार पडेल. यामुळे तालुक्यातील विविध राजकीय पक्षांची लगबग सुरु आहे. राजापुरात प्रामुख्याने शिवसेना व काँग्रेस या दोन पक्षांकडे जास्त ग्रामपंचायती आहेत. त्या खालोखाल राष्ट्रवादीकडे ग्रामपंचायती आहेत. केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपचे मात्र तालुक्यात खाते शून्य आहे. मनसेसह आरपीआयचीदेखील परिस्थिती अशीच आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत अंतर्गत आरणिातील स्त्री, पुरुष उमेदवारांचे जात प्रमाणपत्रासाठी आता धावपळ सुरु आहे. गतवेळी काही ठिकाणी आरक्षणांतर्गत जातीचे प्रमाणपत्र नसल्याने काही ठिकाणच्या जागा रिक्त राहिल्या होत्या. तशी वेळ यावेळी येऊ नये म्हणून अनेक राजकीय पक्षांनी ती खबरदारी घेतली आहे. स्थानिक पातळीवरील विकास प्रचारादरम्यानचा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे.
गावांतर्गत असलेली शांतता सुव्यवस्था अबाधित राहवी यासाठी बिनविरोध पार पडाव्यात यासाठी गावोगावच्या तंटामुक्त समित्या सरसावल्या असून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाले आहेत. जिल्हापरिषदेसह पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण निवडणुकमय बनू लागले आहे. (प्रतिनिधी)