शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

गद्दारांची सावली शिवसेनेवर कधीच नको

By admin | Updated: August 3, 2014 22:46 IST

कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका : सुभाष बने यांच्या प्रवेशाला शिवसेनेतूनच जोरदार विरोध

देवरुख : शिवसेनेत पुन्हा प्रवेश करणाऱ्यांच्या विरोधात सेनेच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी रणशिंग फुंकले असून, कोणत्याही परिस्थितीत त्यांना शिवसेनेत घेतले जाऊ नये. अशा गद्दारांची सावली शिवसेनेवर नको, अशी ठाम भूमिका संगमेश्वर तालुक्यातील शिवसैनिकांनी रविवारी दुपारच्या मेळाव्यात मांडली.देवरुख शहरातील नृसिंह मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यामध्ये अनेकांनी पोटतिडकीने आपली भूमिका स्पष्ट केली. संपूर्ण सभागृहाचे मत यापूर्वी असणाऱ्यांना पक्षात थारा देऊ नये, अशाच प्रकारचे व्यक्त झाले. काँग्रेसमधील काही नेते, कार्यकर्ते, मनसेतील काही मंडळी शिवसेनेच्या वाटेवर आहेत. अशा बातम्या वारंवार येऊ लागल्याने तालुका ढवळून निघाला होता. अनेकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. अशावेळी ८ आॅगस्ट रोजी आयोजित केलेला मेळावा अचानक रद्द करुन ३ रोजी घेण्यात आला.या मेळाव्यात अनेकांना आपले मत मांडण्याची संधी देण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख प्रमोद पवार म्हणाले की, शिवसेनेला याची गरज होती तेव्हा यांनी सेनेशी बंडाची भाषा केली आणि आज त्यांना पदे मिळत नसल्याने आणि सेनेची सत्ता येणार म्हणून केवळ फळे चाखायला, पदे मिळवायला हे सेनेत येऊ पाहात आहेत. अशांना कशासाठी घ्यायचे? हाच सूर शिवसैनिक सुरेश रसाळ, आबा खेडेकर, ललिता गुडेकर, रवींद्र सावंत, श्रीकृष्ण जागुष्टे, प्रसाद सावंत, अशोक सप्रे, उपसभापती संतोष थेराडे, नगरसेवक नंदादीप बोरुकर यांनीही आळवला.आम्ही आजपर्यंत सेनेच्या पाठीशी उभे राहात आलो. देवरुखात सेना वाढविण्याचे काम करीत आलोय. आज आम्ही कमी पडतोय का...? आणि म्हणून बंडखोरांना पुन्हा घेतले जातेय, असे बोलत सेनेत कोण घेत आहे हा निर्णय कुणाचा आहे, याबाबत आमदार सदानंद चव्हाणांनी खुलासा करावा, असे बोरुकर यांनी स्पष्ट केले.त्यानंतर बोलताना चव्हाण म्हणाले की, १९ जुलै रोजी रवींद्र नाट्यमंदिरात झालेल्या कार्यक्रमात सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर व अन्य मंडळींनी संगमेश्वरातील काही मंडळी सेनेत पुन्हा येऊ पाहात असल्याचा विषय आपल्याजवळ काढल्याचे स्पष्ट केले. मात्र, आपण याबाबत कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. तसेच पक्षप्रवेशाच्या तारखेबद्दलदेखील मला काहीच माहीत नव्हते, असे बोलून आपण हा विषय जिल्हाप्रमुखांच्या कानी घातल्याने स्पष्ट केले.संघटनेत अनेकांना चटके बसले आहेत. म्हणूनच हे वैभव प्राप्त झाले आहे. या वैभवाचा खरा हकदार सामान्य शिवसैनिक आहे आणि आज पदे घेण्याची त्यांची वेळ आली असताना ती त्यांची हक्काची जागा दुसरा कोणी घेणार असेल तर ते होऊ देणार नाही. शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांना पक्षात थारा नको. या साऱ्यांच्या भावनेचा मीही आदर करीत आहे. त्यामुळे पक्ष मॅनेज करु पाहणाऱ्यांना पक्षात नको. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आता संभ्रमात राहण्याची गरज नाही. भगव्याचा झंजावात थांबवण्याची ताकद सध्या कुठल्या पक्षात दिसत नसल्याचे मत जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी परखडपणे व्यक्त केले. (प्रतिनिधी)