शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

सागरी मासेमारी ठप्प; २०० कोटींचे नुकसान- सागरी वाऱ्यांमुळे मच्छीमारी नौका बंदरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 11:58 IST

समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका वाऱ्याचा वेग वाढल्याने मासेमारी न करताच माघारी फिरल्या असून, वारा कमी होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

ठळक मुद्देनिसर्गाच्या अवकृपेने जिल्ह्यातील सागरी मासेमारीचे करोडोंचे नुकसान, भरपाई नाहीच.संपलेल्या ६ महिन्यांच्या हंगामातील ४ महिने सागरी मासेमारी ठप्पच.हंगामातील महा, क्यार यासारख्या चार वादळांनी सागरी मासेमारीचे कंबरडेच मोडले परकीय चलनातही मोठी घट.

रत्नागिरी : पावसाळ्यानंतर सुरू झालेल्या सागरी मासेमारी व्यवसायाला गेल्या ६ महिन्यांपासून संकटांच्या गर्तेतून जावे लागत आहे. गेल्या पंधरवड्यापासून सातत्याने सागरी वारे वाहू लागल्याने सागरातील मासेमारी ठप्प झाली आहे. गजबजलेल्या मिरकरवाडा व अन्य मासेमारी बंदरांमध्ये मासेमारी नौका नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. सहा महिन्यांच्या संपलेल्या हंगामात मासेमारी व्यवसायाचे सुमारे २०० कोटींचे नुकसान झाले आहे.दिनांक १ जून ते ३१ जुलै २०१९ या दोन महिन्यांच्या काळात पावसाळी मासेमारीला बंदी होती. १ ऑगस्ट २०१९पासून पारंपरिक तर १ सप्टेंबर २०१९पासून पर्ससीन मासेमारी सुरू झाली. मात्र, निसर्गाची अवकृपा सातत्याने सागरी मासेमारीच्या मुळावर आली. ऑगस्ट महिन्यात पावसामुळे संपूर्ण महिना मासेमारी होऊ शकली नाही. १ सप्टेंबर २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या पाच महिन्यांच्या काळात तुफानी वारे, अतिवृष्टी यामुळे सागरी मासेमारी ३ महिन्यांपेक्षा अधिक काळ ठप्प होती. त्यामुळे संपलेल्या सहा महिन्यातील एकूण ४ महिने मासेमारी हंगाम चाललाच नाही.दिनांक ३१ डिसेंबर २०१९ला पर्ससीन मासेमारीचा चार महिन्यांचा हंगामही संपुष्टात आला. आधीच चार महिने हंगाम असताना तोही हातातून गेल्याने पर्ससीन मासेमारीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मत्स्योत्पादनात या हंगामात मोठी घट झाली आहे. पर्ससीन मासेमारी १ जानेवारी २०२०पासून बंद झालेली असली तरी पारंपरिक मासेमारी सुरू आहे. मात्र, जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात काही बेकायदा पर्ससीन, मिनी पर्ससीन, परराज्यातील घुसखोर मासेमारी नौका तसेच एलईडी मासेमारीचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांच्या जाळ्यातही मासळीच येत नसल्याचे पारंपरिक मच्छिमारांचे म्हणणे आहे.समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका वाऱ्याचा वेग वाढल्याने मासेमारी न करताच माघारी फिरल्या असून, वारा कमी होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. गेल्या सहा दिवसांपासून या नौका बंदरांमध्ये नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. मासेमारीवरील संकटांमुळे पर्ससीन मासेमारी, पारंपरिक मच्छीमारी प्रकारांमधील रापण, होडीतून वल्हवून मासेमारी करणारे तियानीवाले, आऊटबोर्ड इंजिनच्या सहाय्याने होणारी गिलनेट मासेमारी, बलावाद्वारे होणारी मासेमारी तसेच मच्छी विक्रेत्या महिला, मासळी वाहतूक करणारे हातगाडी-रिक्षा टेम्पो, बर्फ कारखानदार, मच्छीमारी सहकारी संस्था, मासेमारीचे साहित्य विकणारे, मासळी एजंट, हॉटेल्स, पर्यटन व्यावसायिक यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.यंदाच्या हंगामात सागरी मासेमारीला ग्रहण लागले आहे. जिल्ह्याच्या बाजारपेठेतील उलाढालीवरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. मच्छिमारांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने जिल्ह्यात मत्स्यदुष्काळ जाहीर करावा व मच्छिमारांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यातील सागरी मासेमारी ठप्प झाल्याने, ४ महिने हंगाम वाया गेल्याने मच्छिमारांचे संपलेल्या हंगामामध्ये सुमारे २०० कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. मासेमारी व्यवसायातून शासनाला करोडोंचे परकीय चलन मिळते. परंतु, यावेळी परकीय चलनात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यावरून मच्छिमारांचे किती नुकसान झाले, याचा अंदाज शासनालाही घेता येईल, असे मच्छीमार नेते नदीम सोलकर म्हणाले.मत्स्यदुष्काळ जाहीर करासागरी मासेमारीवर सातत्याने गेल्या सहा महिन्यांच्या हंगामात संकटे आली. हंगामात चारवेळा महा, क्यारसारखी वादळे झाली. अवकाळी पावसाने शेतीचे, मासेमारीचे करोडोंचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना काही प्रमाणात शासनाची मदत मिळाली. मात्र, मच्छिमारांना प्रचंड नुकसान होऊनही मदत मिळालेली नाही, असे मच्छीमार नेते नदीम सोलकर यांनी ह्यलोकमतह्णला सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणfishermanमच्छीमार