शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
4
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
5
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
6
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
7
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
8
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
9
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
10
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
11
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
12
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
13
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
14
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
15
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
16
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
17
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
18
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
19
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
20
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?

सागरी मासेमारी ठप्प; २०० कोटींचे नुकसान- सागरी वाऱ्यांमुळे मच्छीमारी नौका बंदरातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 11:58 IST

समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका वाऱ्याचा वेग वाढल्याने मासेमारी न करताच माघारी फिरल्या असून, वारा कमी होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.

ठळक मुद्देनिसर्गाच्या अवकृपेने जिल्ह्यातील सागरी मासेमारीचे करोडोंचे नुकसान, भरपाई नाहीच.संपलेल्या ६ महिन्यांच्या हंगामातील ४ महिने सागरी मासेमारी ठप्पच.हंगामातील महा, क्यार यासारख्या चार वादळांनी सागरी मासेमारीचे कंबरडेच मोडले परकीय चलनातही मोठी घट.

रत्नागिरी : पावसाळ्यानंतर सुरू झालेल्या सागरी मासेमारी व्यवसायाला गेल्या ६ महिन्यांपासून संकटांच्या गर्तेतून जावे लागत आहे. गेल्या पंधरवड्यापासून सातत्याने सागरी वारे वाहू लागल्याने सागरातील मासेमारी ठप्प झाली आहे. गजबजलेल्या मिरकरवाडा व अन्य मासेमारी बंदरांमध्ये मासेमारी नौका नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. सहा महिन्यांच्या संपलेल्या हंगामात मासेमारी व्यवसायाचे सुमारे २०० कोटींचे नुकसान झाले आहे.दिनांक १ जून ते ३१ जुलै २०१९ या दोन महिन्यांच्या काळात पावसाळी मासेमारीला बंदी होती. १ ऑगस्ट २०१९पासून पारंपरिक तर १ सप्टेंबर २०१९पासून पर्ससीन मासेमारी सुरू झाली. मात्र, निसर्गाची अवकृपा सातत्याने सागरी मासेमारीच्या मुळावर आली. ऑगस्ट महिन्यात पावसामुळे संपूर्ण महिना मासेमारी होऊ शकली नाही. १ सप्टेंबर २०१९ ते ३१ जानेवारी २०२० या पाच महिन्यांच्या काळात तुफानी वारे, अतिवृष्टी यामुळे सागरी मासेमारी ३ महिन्यांपेक्षा अधिक काळ ठप्प होती. त्यामुळे संपलेल्या सहा महिन्यातील एकूण ४ महिने मासेमारी हंगाम चाललाच नाही.दिनांक ३१ डिसेंबर २०१९ला पर्ससीन मासेमारीचा चार महिन्यांचा हंगामही संपुष्टात आला. आधीच चार महिने हंगाम असताना तोही हातातून गेल्याने पर्ससीन मासेमारीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मत्स्योत्पादनात या हंगामात मोठी घट झाली आहे. पर्ससीन मासेमारी १ जानेवारी २०२०पासून बंद झालेली असली तरी पारंपरिक मासेमारी सुरू आहे. मात्र, जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रात काही बेकायदा पर्ससीन, मिनी पर्ससीन, परराज्यातील घुसखोर मासेमारी नौका तसेच एलईडी मासेमारीचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छिमारांच्या जाळ्यातही मासळीच येत नसल्याचे पारंपरिक मच्छिमारांचे म्हणणे आहे.समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या नौका वाऱ्याचा वेग वाढल्याने मासेमारी न करताच माघारी फिरल्या असून, वारा कमी होण्याची प्रतीक्षा करीत आहेत. गेल्या सहा दिवसांपासून या नौका बंदरांमध्ये नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. मासेमारीवरील संकटांमुळे पर्ससीन मासेमारी, पारंपरिक मच्छीमारी प्रकारांमधील रापण, होडीतून वल्हवून मासेमारी करणारे तियानीवाले, आऊटबोर्ड इंजिनच्या सहाय्याने होणारी गिलनेट मासेमारी, बलावाद्वारे होणारी मासेमारी तसेच मच्छी विक्रेत्या महिला, मासळी वाहतूक करणारे हातगाडी-रिक्षा टेम्पो, बर्फ कारखानदार, मच्छीमारी सहकारी संस्था, मासेमारीचे साहित्य विकणारे, मासळी एजंट, हॉटेल्स, पर्यटन व्यावसायिक यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.यंदाच्या हंगामात सागरी मासेमारीला ग्रहण लागले आहे. जिल्ह्याच्या बाजारपेठेतील उलाढालीवरही त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. मच्छिमारांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने जिल्ह्यात मत्स्यदुष्काळ जाहीर करावा व मच्छिमारांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यातील सागरी मासेमारी ठप्प झाल्याने, ४ महिने हंगाम वाया गेल्याने मच्छिमारांचे संपलेल्या हंगामामध्ये सुमारे २०० कोटींपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. मासेमारी व्यवसायातून शासनाला करोडोंचे परकीय चलन मिळते. परंतु, यावेळी परकीय चलनात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यावरून मच्छिमारांचे किती नुकसान झाले, याचा अंदाज शासनालाही घेता येईल, असे मच्छीमार नेते नदीम सोलकर म्हणाले.मत्स्यदुष्काळ जाहीर करासागरी मासेमारीवर सातत्याने गेल्या सहा महिन्यांच्या हंगामात संकटे आली. हंगामात चारवेळा महा, क्यारसारखी वादळे झाली. अवकाळी पावसाने शेतीचे, मासेमारीचे करोडोंचे नुकसान झाले. शेतकऱ्यांना काही प्रमाणात शासनाची मदत मिळाली. मात्र, मच्छिमारांना प्रचंड नुकसान होऊनही मदत मिळालेली नाही, असे मच्छीमार नेते नदीम सोलकर यांनी ह्यलोकमतह्णला सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीkonkanकोकणfishermanमच्छीमार