शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
3
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
4
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
5
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
6
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
7
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
8
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
9
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
10
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
11
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
12
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
13
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
14
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
15
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
16
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
17
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
18
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
19
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
20
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

इंधन दरवाढीमुळे भाज्यांच्या दरात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 10:33 IST

Petrol vegetable Ratnagiri -पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाल्याने, त्याचा परिणाम भाजीपाला दरावर झाला आहे. जिल्ह्यात येणारा बहुतांश भाजीपाला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून येत आहे. फळे मुंबई, पुणे येथून येत आहेत. इंधन दरवाढीचा परिणाम घाऊक बाजारपेठेत झाला आहे. वाहतूक भाडे वाढल्याने किरकोळ भाजीविक्रीच्या दरात वाढ झाली आहे.

ठळक मुद्देइंधन दरवाढीमुळे भाज्यांच्या दरात वाढकांदा, लसणीच्या दरात चढउतार सुरूच

रत्नागिरी : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाल्याने, त्याचा परिणाम भाजीपाला दरावर झाला आहे. जिल्ह्यात येणारा बहुतांश भाजीपाला कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातून येत आहे. फळे मुंबई, पुणे येथून येत आहेत. इंधन दरवाढीचा परिणाम घाऊक बाजारपेठेत झाला आहे. वाहतूक भाडे वाढल्याने किरकोळ भाजीविक्रीच्या दरात वाढ झाली आहे.इंधनाचे दर वाढल्याने वाहतूक भाडे वाढले. परिणामी, भाजीच्या दरात किलोमागे १० ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. परिणामी, सर्वसामान्य ग्राहकांचे हाल होत आहेत. खाद्यतेलाचे भाव कडाडले असून, एक लीटरसाठी १५० रुपये मोजावे लागत आहेत.

कांदा ५० ते ६० रुपये, बटाटा २५ रुपये तर लसूण १२० रुपये किलो दराने विक्री सुरू आहे. मात्र, परजिल्ह्यातील शेतकरी शंभर रुपयास सव्वा ते दीड किलो लसूण, तर कांदा ४० ते ४५ रुपये किलो दराने विकत आहेत.परजिल्ह्यातील विक्रेतेपरजिल्ह्यातून विक्रेते शहर, तसेच जिल्ह्यात येत आहेत. ट्रक भरून कांदा, बटाटा, लसूण विक्रीसाठी आणत असून, बाजारभावापेक्षा कमी दरात विकत असल्याने ग्राहक खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. शहरातील नाक्या-नाक्यावर दहा किलोच्या बॅगांतून कांदा विक्री करीत असून, ग्राहकांचा खरेदीसाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे.अननस मुबलकसध्या बाजारात कलिंगडासह अननस मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी उपलब्ध आहे. पिकलेले अननस ६० ते ७० रुपये प्रति नग दराने विक्री सुरू आहे. हातगाडी विक्रेते शहरातील गल्लीबोळातून विक्री करीत आहेत.बिस्कीटे गिफ्टखाद्यतेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. सहा महिन्यांत तेलाचे दर लीटरमागे ५० ते ६० रुपयांनी वाढले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी खाद्यतेल खरेदीवर भेटवस्तू जाहीर केली आहे. एका कंपनीकडून चक्क बिस्किटचे पुडे दिले जात आहेत.

महागाईवर शासनाचे निर्बंध नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना याचा फटका बसत आहे. इंधनदर वाढ झाली की, भाजीपाला, फळे, तसेच अन्य वस्तूंची दरवाढ होत आहे. दरवाढीवर नियंत्रण गरजेचे आहे.- प्रभा देसाई, गृहिणी

कोरोनामुळे वर्षभरात आर्थिक समस्येला सर्वांनाच सामोरे जावे लागले. त्यातच महागाई वाढत असल्याने सर्वसामान्य होरपळत आहेत. सामान्य जनतेचा शासनाने विचार करून अंमलबजावणी करावी.- शैलजा पाटील, गृहिणी

टॅग्स :MarketबाजारPetrolपेट्रोलvegetableभाज्याRatnagiriरत्नागिरी