शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

भातगाव कोसबी शाळेत ‘रिंग द बेल फॉर वॉटर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 11:54 PM

रत्नागिरी : शाळेच्या दैनंदिन वेळापत्रकात मधल्या वेळची जेवणाची सुटीवगळता सकाळी व संध्याकाळी अशा दोन सत्रात दोन सुट्या होतात. त्यासाठी ...

रत्नागिरी : शाळेच्या दैनंदिन वेळापत्रकात मधल्या वेळची जेवणाची सुटीवगळता सकाळी व संध्याकाळी अशा दोन सत्रात दोन सुट्या होतात. त्यासाठी घंटा अथवा बेल वाजविली जाते. मात्र, नियमित शाळा भरण्याच्या, सुटण्याच्या वेळा, जेवणाची सुटी, व दोन सत्रातील दोन छोट्या सुट्यांसाठी बेल वाजवित असताना आता नवीन बेल सुरू करण्यात आली आहे. ही बेल वाजताच विद्यार्थी आपापल्या पाण्याच्या बाटल्या काढून त्यातील पाणी पित आहेत. भातगाव-कोसबी शाळेमध्ये ‘रिंग द बेल फॉर वॉटर’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.दिवसभर मुले पुरेसे पाणी पित नसल्याने जिल्हा परिषद शाळा भातगाव कोसबीमध्ये ‘रिंग द बेल फॉर वॉटर’ या नाविन्यपूर्ण उपक्रमातून मुलांना पाणी पिण्यास प्रोत्साहित करण्यात येत आहे. मुलांचाही याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. विशेषकरून पालकही मुलांच्या पाणी पिण्यामुळे खूश झाले आहेत.दिवसात किमान दोन ते तीन लीटर पाणी शरीराला आवश्यक आहे. मात्र, मुले एवढे पाणी पित नसल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. हे लक्षात घेऊन कोसबी शाळेच्या शिक्षकांनी पाणी पिण्यासाठी बेल वाजविण्याचा निर्णय घेतला, शिवाय अंमलबजावणीही सुरू केली आहे. पाणी पिण्यासाठी बेल देण्यात येणार असल्याची सूचना देण्यात आली होती, त्यानंतर दिवसातून ठराविक वेळी बेल वाजविली जाते. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना दोन मिनिटे पाणी पिण्यासाठी वेळ दिला जातो. सर्व विद्यार्थी एकाच वेळी जेवढी तहान असेल तेवढे पाणी पितात. पहिली बेल सकाळी अकरा वाजता दिली जाते त्यानंतर बारा, एक, तीन, चार वाजता याप्रमाणे दिवसातून पाच वेळा बेल देण्यात येत आहे.आरोग्य विज्ञानानुसार पाणी नियमितपणे प्यायल्याने मूत्रावाटे क्षार बाहेर टाकले जातात. त्यामुळे मुतखडा होण्याची शक्यता कमी असते. आपल्या शरीरात ६0 टक्के पाणी असते. लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्त्वांचे परिवहन, शरीरातील विषारी पदार्थांचे विसर्जन या सर्व क्रिया पाण्यावर अवलंबून आहेत. विद्यार्थ्यांमध्ये जलजागृती व्हावी, विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी हा उपक्रम मुख्याध्यापक संतोष रावणंग व सहकारी शिक्षक शाळेमध्ये राबवित असून, या उपक्रमाचे ग्रामस्थांकडूनही विशेष कौतुक होत आहे.चळवळ व्हावीबदलत्या तापमानामुळे उष्मा आता तीव्रपणे जाणवू लागला आहे. अशा दिवसात कमी पाण्यामुळे मुलांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. त्यावर ‘पाण्यासाठी घंटा’ अशा माध्यमातून शाळांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. ‘पाण्यासाठी घंटा’ हा केवळ उपक्रम न राहता एक चळवळ म्हणून सर्वत्र पसरण्याची गरज आहे.