शहरं
Join us  
Trending Stories
1
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
2
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
5
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
6
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
7
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
8
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
9
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
10
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
11
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
12
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
13
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
14
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
15
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
16
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
17
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
18
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
19
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST

खेड : तालुक्यातील मांडवे ग्रामपंचायतीच्या दीड वर्षानंतर झालेल्या ग्रामसभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सरपंच सुनीता कासार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना ...

खेड : तालुक्यातील मांडवे ग्रामपंचायतीच्या दीड वर्षानंतर झालेल्या ग्रामसभेला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सरपंच सुनीता कासार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत ही ग्रामसभा पार पडली. या वेळी विविध शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. ग्रामस्थांच्या काही शंका आल्या होत्या त्यांचेही निरसन केले गेले.

ग्रामस्वच्छता अभियान

खेड : तालुक्यातील गुणदे ग्रामपंचायत व स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुणदे येथील ग्रामदैवत मंदिर व परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेेंतर्गत सभोवतालचा परिसर स्वच्छ करण्यात आला. सरपंच रवींद्र आंब्रे, उपसरपंच संध्या कांदेकर, सदस्य सुभाष आंब्रे, रुणाली आंब्रे व अन्य सदस्य, स्वराज्याचे शिलेदार प्रतिष्ठानचे सदस्य सहभागी झाले होते.

बैठकीत चर्चा

खेड : खेड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ची बैठक शासकीय विश्रामगृहात कोकण प्रदेश संपर्कप्रमुख सुशांत सकपाळ, तालुकाध्यक्ष शंकर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तसेच या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. या वेळी पार्टीचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

तंटामुक्त अध्यक्षपदी विलास नारकर

राजापूर : तालुक्यातील करक ग्रामपंचायतीची ग्रामसभा पार पडली. या वेळी माजी सरपंच विलास नारकर यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. विलास नारकर यांनी यापूर्वी करक ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषवले आहे. तसेच या परिसरात ते सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत.

गणपतीपुळेत आज रक्तदान शिबिर

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे पंचक्रोशी मदत ग्रुपतर्फे सोमवार २७ सप्टेंबर रोजी पर्यटन दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर गणपतीपुळे येथील श्री चंडिका देवी मंदिरात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. तरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या शिबिरात यावे व रक्तदान करावे, असे आवाहन मदत ग्रुपतर्फे करण्यात आले आहे.

गाड्यांना मुदतवाढ

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रत्नागिरी मडगाव पॅसेंजर तसेच दिवा रत्नागिरी गाडीसह आठ गाड्यांना ऑक्टोबर अखेरपर्यंत चालवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गाड्या मर्यादित कालावधीसाठी जाहीर करण्यात आल्या होत्या.