शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

इनाम जमिनी वहिवाटदारांच्या!

By admin | Updated: August 10, 2015 00:39 IST

देवस्थान इनाम : शासन निर्णयानंतर जिल्ह्यातील २०३ वहिवाटदार पात्र

शोभना कांबळे -रत्नागिरी -देवस्थानांची देखभाल तसेच दुरूस्तीचा प्रश्न वाढू लागल्याने शासनाने आता देवस्थान इनाम खालसा करून या जमिनी ज्यांनी आतापर्यंत सांभाळल्या आहेत, त्या वहिवाटदारांना मालकी हक्काने देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १३८ गावातील २०३ देवस्थानच्या इनाम जमिनींवर वहिवाटदारांना मालकी हक्क मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पूर्वी राजे महाराजे, सरंजाम यांच्याकडून देवस्थानासाठी काही जमिनी इनाम दिल्या होत्या. मात्र, अनेक वर्षे उलटल्याने या इनाम जमिनींवर असलेल्या अनेक वर्षांच्या जुन्या देवस्थानांच्या बांधकामांची देखभाल आणि दुरूस्तीचा प्रश्न सर्वच राज्यांमध्ये ऐरणीवर आला आहे. शहरी व ग्रामीण भागातील अनेक जमिनींची नोंद ही देवस्थान इनाम म्हणून करण्यात आली आहे. या सर्व जमिनी वर्ग - ३ मध्ये मोडत असल्याने त्याचा वापर करणाऱ्या वहिवाटदारांना घर दुरूस्ती व अन्य कारणांसाठी वारंवार परवानगी घ्यावी लागते. काहीवेळा तर त्यांच्या जमिनीवर अतिक्रमणही होते. हे निदर्शनास आल्याने हे प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने गुजरातमध्ये या इनाम जमिनीवर वहिवाट असलेल्यांनाच या जमिनी मालकी हक्काने देण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर महाराष्ट्रातही हा निर्णय घेण्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेत केली आहे. मात्र, मालकी हक्काने जमिनी देताना त्या ज्या कारणासाठी दिल्या आहेत, त्याच कारणासाठी त्याचा वापर होणार आहे का, हेही पाहिले जाणार आहे. याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे. असा निर्णय झाल्यास जिल्ह्यातील १३८ गावांतील २०३ देवस्थानांच्या इनाम जमिनी, त्या जमिनीवर वहिवाट असलेल्यांच्या मालकी हक्काच्या होण्यास मदत होणार आहे. या निर्णयावर शासनाने अंतिम स्वरूप देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. कोकणात अनेक ठिकाणी देवस्थानच्या जमिनींबाबत काही चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी निर्णय प्रलंबित आहेत. काहींनी कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. मात्र, या निर्णयावर अंतिम स्वरूप न आल्याने अनेकांनी याबाबत वाट पहाणेच पसंत केले आहे. या प्रकरणात अनेक वर्षे न्याय मिळत नसल्याने आता कालावधी लोटल्यानंतर काही महत्वाचा निर्णय सरकार दरबारी होत आहे.