शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

रत्नागिरी : आपुलकीतर्फे सफाई कामगारांचे गोडकौतुक, नववर्षदिनी भेट, दीडशे कामगारांना मिठाईचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 17:03 IST

रत्नागिरी शहर जागण्याआधीच शहराची साफसफाई करण्यासाठी पहाटे बाहेर पडणाऱ्या सफाई कामगारांचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. येथील आपुलकी सामाजिक संस्थेने शहरातील १५० सफाई कामगारांना एकत्र आणत मिठाईचे वाटप केले. अशा पध्दतीचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबविण्यात आल्याने नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी संस्थेचे कौतुक केले आहे.

ठळक मुद्दे नववर्षदिनी भेट, दीडशे कामगारांना मिठाईचे वाटपआपुलकीतर्फे सफाई कामगारांचे गोडकौतुकरत्नागिरीत पहिल्यांदाच उपक्रम, सौरभ मलुष्टे यांचा पुढाकार

रत्नागिरी : शहर जागण्याआधीच शहराची साफसफाई करण्यासाठी पहाटे बाहेर पडणाऱ्या सफाई कामगारांचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. शहरातील नाले, गटारे, कचराकुंड्या, रस्ते तसेच शहर परिसर स्वच्छ करण्यात सफाई कामगार अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांच्या नवीन वर्षाची सुरूवात ही गोडकौतुक करून व्हावी म्हणून येथील आपुलकी सामाजिक संस्थेने रत्नागिरी शहरातील १५० सफाई कामगारांना एकत्र आणत मिठाईचे वाटप केले. अशा पध्दतीचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबविण्यात आल्याने नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी संस्थेचे कौतुक केले आहे.शहराची स्वच्छता करण्यासाठी सफाई कामगारांना वेतन मिळते हे जरी खरे असले तरी हे काम करणे खूप अवघड आहे. शहरातील घाण या कामगारांकडून स्वच्छ केली जाते. शहराची स्वच्छता करणे व घरी जाणे यापलिकडे त्यांचे दुसरे आयुष्य नाही. कोणत्याही कार्यक्रमात त्यांचा सहभाग नसतो. मात्र, तरीही मनापासून संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचे काम हे सर्व कामगार करतात. अशा या कामगारांचा नववर्षाचा पहिला दिवस आनंदमयी करावा या हेतूने आपुलकी सामाजिक संस्थेचे सौरभ मलुष्टे यांनी पुढाकार घेतला.

या कामगारांचे गोडकौतुक करण्यासाठी नगराध्यक्ष राहुल पंडित, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, उद्योजक किरण उर्फ भय्या सामंत, मुख्याधिकारी अरविंंद माळी, उपनगराध्यक्षा स्मितल पावसकर, पोलीस निरीक्षक अनिल विभुते, नगरसेवक बंड्या साळवी, शिल्पा सुर्वे, राजन शेट्ये, प्रशांत साळुंखे, विलास चाळके, बारक्या हळदणकर, भय्या भोंगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.अशा पद्धतीचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबविण्यात आला, या सफाई कामगारांचा वेतनवाढीचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही यानिमित्ताने आपण देत असल्याचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सांगितले. तर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनीही सफाई कामगारांसाठीचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपुलकी संस्थेचे सौरभ मलुष्टे, प्रणय पोळेकर, जान्हवी पाटील यांच्यासह राजेंद्र चव्हाण, किशोर मोरे, राजेश शेळके, विजय पाडावे, अभिजित नांदगावकर, राजेश कळंबटे, बंटी पाथरे, सुदीप जाधव, प्रशांत हर्चेकर, नीलेश कदम, सचिन बोरकर, तन्मय दाते यांचे सहकार्य लाभले.सौरभ मलुष्टे यांचा पुढाकारआपुलकी या सामाजिक संस्थेचे वर्षभर समाजातील दुर्लक्षित, वंचित घटकांसाठी विविध उपक्रम सुरू असतात. यापूर्वी रत्नागिरीतील नगरपालिकेच्या २० होतकरू विद्यार्थ्यांना संस्थेकडून शैक्षणिक मदतही करण्यात आली असून, मनोरूग्ण, बंदिवान यांच्या पुनर्वसनासाठी मार्गदर्शक व विविध सण-उत्सवानुसार कार्यक्रम घेण्यात आले आहेत. यासाठी उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या पुढाकाराने आतापर्यंत अनेकांना मदत करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान