शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

रत्नागिरी : आपुलकीतर्फे सफाई कामगारांचे गोडकौतुक, नववर्षदिनी भेट, दीडशे कामगारांना मिठाईचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 17:03 IST

रत्नागिरी शहर जागण्याआधीच शहराची साफसफाई करण्यासाठी पहाटे बाहेर पडणाऱ्या सफाई कामगारांचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. येथील आपुलकी सामाजिक संस्थेने शहरातील १५० सफाई कामगारांना एकत्र आणत मिठाईचे वाटप केले. अशा पध्दतीचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबविण्यात आल्याने नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी संस्थेचे कौतुक केले आहे.

ठळक मुद्दे नववर्षदिनी भेट, दीडशे कामगारांना मिठाईचे वाटपआपुलकीतर्फे सफाई कामगारांचे गोडकौतुकरत्नागिरीत पहिल्यांदाच उपक्रम, सौरभ मलुष्टे यांचा पुढाकार

रत्नागिरी : शहर जागण्याआधीच शहराची साफसफाई करण्यासाठी पहाटे बाहेर पडणाऱ्या सफाई कामगारांचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. शहरातील नाले, गटारे, कचराकुंड्या, रस्ते तसेच शहर परिसर स्वच्छ करण्यात सफाई कामगार अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांच्या नवीन वर्षाची सुरूवात ही गोडकौतुक करून व्हावी म्हणून येथील आपुलकी सामाजिक संस्थेने रत्नागिरी शहरातील १५० सफाई कामगारांना एकत्र आणत मिठाईचे वाटप केले. अशा पध्दतीचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबविण्यात आल्याने नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी संस्थेचे कौतुक केले आहे.शहराची स्वच्छता करण्यासाठी सफाई कामगारांना वेतन मिळते हे जरी खरे असले तरी हे काम करणे खूप अवघड आहे. शहरातील घाण या कामगारांकडून स्वच्छ केली जाते. शहराची स्वच्छता करणे व घरी जाणे यापलिकडे त्यांचे दुसरे आयुष्य नाही. कोणत्याही कार्यक्रमात त्यांचा सहभाग नसतो. मात्र, तरीही मनापासून संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचे काम हे सर्व कामगार करतात. अशा या कामगारांचा नववर्षाचा पहिला दिवस आनंदमयी करावा या हेतूने आपुलकी सामाजिक संस्थेचे सौरभ मलुष्टे यांनी पुढाकार घेतला.

या कामगारांचे गोडकौतुक करण्यासाठी नगराध्यक्ष राहुल पंडित, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, उद्योजक किरण उर्फ भय्या सामंत, मुख्याधिकारी अरविंंद माळी, उपनगराध्यक्षा स्मितल पावसकर, पोलीस निरीक्षक अनिल विभुते, नगरसेवक बंड्या साळवी, शिल्पा सुर्वे, राजन शेट्ये, प्रशांत साळुंखे, विलास चाळके, बारक्या हळदणकर, भय्या भोंगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.अशा पद्धतीचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबविण्यात आला, या सफाई कामगारांचा वेतनवाढीचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही यानिमित्ताने आपण देत असल्याचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सांगितले. तर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनीही सफाई कामगारांसाठीचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपुलकी संस्थेचे सौरभ मलुष्टे, प्रणय पोळेकर, जान्हवी पाटील यांच्यासह राजेंद्र चव्हाण, किशोर मोरे, राजेश शेळके, विजय पाडावे, अभिजित नांदगावकर, राजेश कळंबटे, बंटी पाथरे, सुदीप जाधव, प्रशांत हर्चेकर, नीलेश कदम, सचिन बोरकर, तन्मय दाते यांचे सहकार्य लाभले.सौरभ मलुष्टे यांचा पुढाकारआपुलकी या सामाजिक संस्थेचे वर्षभर समाजातील दुर्लक्षित, वंचित घटकांसाठी विविध उपक्रम सुरू असतात. यापूर्वी रत्नागिरीतील नगरपालिकेच्या २० होतकरू विद्यार्थ्यांना संस्थेकडून शैक्षणिक मदतही करण्यात आली असून, मनोरूग्ण, बंदिवान यांच्या पुनर्वसनासाठी मार्गदर्शक व विविध सण-उत्सवानुसार कार्यक्रम घेण्यात आले आहेत. यासाठी उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या पुढाकाराने आतापर्यंत अनेकांना मदत करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान