शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

रत्नागिरी : आपुलकीतर्फे सफाई कामगारांचे गोडकौतुक, नववर्षदिनी भेट, दीडशे कामगारांना मिठाईचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 17:03 IST

रत्नागिरी शहर जागण्याआधीच शहराची साफसफाई करण्यासाठी पहाटे बाहेर पडणाऱ्या सफाई कामगारांचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. येथील आपुलकी सामाजिक संस्थेने शहरातील १५० सफाई कामगारांना एकत्र आणत मिठाईचे वाटप केले. अशा पध्दतीचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबविण्यात आल्याने नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी संस्थेचे कौतुक केले आहे.

ठळक मुद्दे नववर्षदिनी भेट, दीडशे कामगारांना मिठाईचे वाटपआपुलकीतर्फे सफाई कामगारांचे गोडकौतुकरत्नागिरीत पहिल्यांदाच उपक्रम, सौरभ मलुष्टे यांचा पुढाकार

रत्नागिरी : शहर जागण्याआधीच शहराची साफसफाई करण्यासाठी पहाटे बाहेर पडणाऱ्या सफाई कामगारांचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. शहरातील नाले, गटारे, कचराकुंड्या, रस्ते तसेच शहर परिसर स्वच्छ करण्यात सफाई कामगार अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांच्या नवीन वर्षाची सुरूवात ही गोडकौतुक करून व्हावी म्हणून येथील आपुलकी सामाजिक संस्थेने रत्नागिरी शहरातील १५० सफाई कामगारांना एकत्र आणत मिठाईचे वाटप केले. अशा पध्दतीचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबविण्यात आल्याने नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी संस्थेचे कौतुक केले आहे.शहराची स्वच्छता करण्यासाठी सफाई कामगारांना वेतन मिळते हे जरी खरे असले तरी हे काम करणे खूप अवघड आहे. शहरातील घाण या कामगारांकडून स्वच्छ केली जाते. शहराची स्वच्छता करणे व घरी जाणे यापलिकडे त्यांचे दुसरे आयुष्य नाही. कोणत्याही कार्यक्रमात त्यांचा सहभाग नसतो. मात्र, तरीही मनापासून संपूर्ण शहर स्वच्छ करण्याचे काम हे सर्व कामगार करतात. अशा या कामगारांचा नववर्षाचा पहिला दिवस आनंदमयी करावा या हेतूने आपुलकी सामाजिक संस्थेचे सौरभ मलुष्टे यांनी पुढाकार घेतला.

या कामगारांचे गोडकौतुक करण्यासाठी नगराध्यक्ष राहुल पंडित, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, उद्योजक किरण उर्फ भय्या सामंत, मुख्याधिकारी अरविंंद माळी, उपनगराध्यक्षा स्मितल पावसकर, पोलीस निरीक्षक अनिल विभुते, नगरसेवक बंड्या साळवी, शिल्पा सुर्वे, राजन शेट्ये, प्रशांत साळुंखे, विलास चाळके, बारक्या हळदणकर, भय्या भोंगले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.अशा पद्धतीचा उपक्रम शहरात पहिल्यांदाच राबविण्यात आला, या सफाई कामगारांचा वेतनवाढीचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही यानिमित्ताने आपण देत असल्याचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी सांगितले. तर जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांनीही सफाई कामगारांसाठीचा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आपुलकी संस्थेचे सौरभ मलुष्टे, प्रणय पोळेकर, जान्हवी पाटील यांच्यासह राजेंद्र चव्हाण, किशोर मोरे, राजेश शेळके, विजय पाडावे, अभिजित नांदगावकर, राजेश कळंबटे, बंटी पाथरे, सुदीप जाधव, प्रशांत हर्चेकर, नीलेश कदम, सचिन बोरकर, तन्मय दाते यांचे सहकार्य लाभले.सौरभ मलुष्टे यांचा पुढाकारआपुलकी या सामाजिक संस्थेचे वर्षभर समाजातील दुर्लक्षित, वंचित घटकांसाठी विविध उपक्रम सुरू असतात. यापूर्वी रत्नागिरीतील नगरपालिकेच्या २० होतकरू विद्यार्थ्यांना संस्थेकडून शैक्षणिक मदतही करण्यात आली असून, मनोरूग्ण, बंदिवान यांच्या पुनर्वसनासाठी मार्गदर्शक व विविध सण-उत्सवानुसार कार्यक्रम घेण्यात आले आहेत. यासाठी उद्योजक सौरभ मलुष्टे यांच्या पुढाकाराने आतापर्यंत अनेकांना मदत करण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान