शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

रत्नागिरी : तळवडेतील धरणाला गळती, धोक्याचा संभव, लघु पाटबंधारे : लाखो लीटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 2:31 PM

लघु पाटबंधारे विभागाच्या गलथान व ढिसाळ कारभारामुळे तळवडे ब्राह्मणदेव येथील धरणाला गेल्या अनेक वर्षांपासून गळती लागली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने धरणातील लाखो लीटर पाणी वाया जात आहे. भविष्यात गळतीचे प्रमाण वाढल्यास या धरणाला मोठा धोका निर्माण होणार आहे.

ठळक मुद्देतळवडेतील धरणाला गळती, धोक्याचा संभवलघु पाटबंधारे : लाखो लीटर पाणी वाया

पाचल : लघु पाटबंधारे विभागाच्या गलथान व ढिसाळ कारभारामुळे तळवडे ब्राह्मणदेव येथील धरणाला गेल्या अनेक वर्षांपासून गळती लागली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने धरणातील लाखो लीटर पाणी वाया जात आहे. भविष्यात गळतीचे प्रमाण वाढल्यास या धरणाला मोठा धोका निर्माण होणार आहे.सन २००६मध्ये या धरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर पाच ते सहा वर्षांतच या धरणाला गळती सुरू झाली. त्यामुळे धरणात पाण्याचा साठा होत नाही. जानेवारीनंतर या धरणात पाण्याचा ठणठणाट असतो. धरण असूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. जानेवारी ते मे महिन्यापर्यंत ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.आजही या धरणातून दिवसाला लाखो लीटर पाणी वाहून जात आहे. याकडे प्रशासन वा लोकप्रतिनिधींचे लक्ष नसते. त्यामुळे हे धरण सुमारे सतरा वर्षे वापराविना पडून आहे. लघु पाटबंधारे विभागाचे या धराणाच्या दुरूस्तीकडे लक्ष नाही. त्यामुळे या धरणावर झाडेझुडपे वाढली असून, मोठ्या प्रमाणात गवतही वाढले आहे.

तळवडे धरणाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही, तर सध्या सुरू असलेल्या गळतीच्या जागी मोठी गळती होऊन पावसाळ्यात या धरणाला मोठा संभवतो. या धरणाच्या पायथ्याशी सुमारे हजार ते पंधराशे लोकवस्ती असून, याचे गांभीर्य लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना नाही. या धरणाला धोका निर्माण झाल्यास नुकसानाला जबाबदार कोण? असा सवाल होत आहे.

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरी