शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांच्या संख्येत दोन वर्षांत लक्षणीय घट

By admin | Updated: March 24, 2015 00:13 IST

--जागतिक क्षयरोग दिन

रत्नागिरी : हवेमार्फत प्रसार होणाऱ्या क्षयरोगाकडे दुर्लक्ष केल्यास तो रुग्णाला मृत्युच्या दाढेत ओढतोच, शिवाय इतरांनाही त्याचा संसर्ग होतो. हा रोग बरा होणारा असला तरी जिल्ह्यात वर्षभरात त्याचे २२४२ रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, २०१३पेक्षा सन २०१४ वर्षात रुग्णांची संख्या कमी आहे. गेल्या काही दिवसात क्षयरोगाने जिल्ह्यातून ‘एक्झिट’ घेण्याची तयारी चालवली आहे. रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने २४ मार्च १८८२ रोजी क्षयरोगाच्या जंतूचा शोध लावला. त्यामुळे क्षयरोगावर उपचार करणे शक्य झाले. त्याची आठवण म्हणून २४ मार्च १९९३ पासून जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केल्याप्रमाणे संपूर्ण जगभर २४ मार्च हा राष्ट्रीय जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात येत आहे.क्षयरोगाचा प्रसार हवेमार्फत होतो. क्षयरोग झालेली व्यक्ती औषधे घेत नसेल तर खोकल्यातून, शिंकेतून अथवा थुंकीतून क्षयाचे जीवाणू ती इतर लोकांमध्ये पसरविते. शरीरातील कोणत्याही अवयवास क्षयरोग होऊ शकतो. इतर अवयवांच्या तुलनेत फुफ्फुसाला क्षयरोग होण्याचे प्रमाण सर्वात अधिक आहे. जिल्ह्यात रत्नागिरी, राजापूर, कामथे, दापोली, चिखली, देवरुख, कळंबणी आणि लांजा अशा ८ ठिकाणी क्षयरोग नियंत्रण पथके स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हा क्षयरोग केंद्र, ३ उपजिल्हा रुग्णालये, ८ ग्रामीण रुग्णालये, ६७ प्राथमिक आरोग्य केंद्र, ३७८ आरोग्य उपकेंद्र, २ नगर परिषद दवाखाने ही सर्व रुग्णालये डॉट्स उपचार केंद्र म्हणून आरोग्य विभागाकडून घोषित करण्यात आली आहेत. या डॉट्स उपचार केंद्रामार्फत प्रत्येक गावात डॉट्स प्रोव्हायडर नेमून त्यांच्यामार्फत क्षयरुग्णांना प्रत्यक्ष देखरेखीखाली आठवड्यातून तीन वेळा डॉट्स औषधोपचार मोफत देण्यात येतो. क्षयरोगावरील औषधे महागडी आहेत. रुग्णाने खासगी रुग्णालयामध्ये उपचार केल्यास त्याला ४ ते ५ हजार रुपये खर्च येतो. मात्र, शासकीय रुग्णालयांमध्ये क्षयरोगावर मोफत औषधोपचार करण्यात येत आहेत. त्यामुळे बहुतांश रुग्ण या रोगावर शासकीय रुग्णालयात औषधोपचार घेत आहेत. जिल्ह्यात सन २०१३मध्ये २४११ क्षयरोग रुग्ण आढळून आले होते. त्यापैकी उपचाराखाली १२१८ रुग्ण असून, ९३१ रुग्ण औषधोपचारानंतर पूर्ण बरे झाले होते, तर ६२ रुग्णांचा क्षयरोगाने मृत्यू झाला होता. सन २०१४ साली आढळलेल्या २२४२ क्षयरोगाच्या रुग्णांपैकी १२२८ रुग्णांवर औषधोपचार सुरू असून, ९७५ बरे झाले आहेत. या रोगाने मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ५० आहे. मात्र, या रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट झालेली दिसून येत आहे. नियमित औषधोपचार न घेणाऱ्या, व्यसनाधिनता आणि शेवटच्या क्षणी औषधोपचार घेणाऱ्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, क्षयरोगावर वेळीच औषधोपचार केल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो, असे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. (शहर वार्ताहर)