शहरं
Join us  
Trending Stories
1
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
2
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
3
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
4
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
5
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
6
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
7
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
8
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
9
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
10
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
11
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
12
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
13
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
14
भारताच्या शेजारील देशात नेमकं चाललंय काय? कबरींमधून बाहेर काढले जातायेत सांगाडे
15
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
'मुन्नाभाई MBBS' मधील अभिनेता १० वर्षापासून बेपत्ता; गर्लफ्रेंडचाही हार्टअटॅकनं मृत्यू, गूढ कायम!
17
हृदयद्रावक! मुलांच्या कस्टडीसाठी लढतेय अभिनेत्री, चौथ्या मुलाच्या कबरीवर जाऊन ढसाढसा रडली
18
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
19
‘एसी’च्या नव्या वेळापत्रकाने लोकलचा हाेताेय खेळखंडोबा; हार्बर मार्गावर ऐन गर्दीच्या वेळी गैरसाेय, प्रवासी संतप्त
20
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

रूग्णसंख्या कमी होतानाच कोरोनाबाधितांचे मृत्यूही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:52 IST

coronavirus, death, ratnagirinews ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाच मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात जिल्हाभरात केवळ ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचे प्रमाण ३.७४ टक्के इतके झाल्याने त्यांच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. गेल्या दहा दिवसात मृतांच्या संख्येत आणखी दोन रुग्णांची वाढ झाल्याने आतापर्यंत एकूण ३१८ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

ठळक मुद्देसप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात निम्म्याहून कमी बळीआरोग्य विभागाला मोठे यश, ताण झाला कमी

रहिम दलाल

रत्नागिरी : ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाच मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात जिल्हाभरात केवळ ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचे प्रमाण ३.७४ टक्के इतके झाल्याने त्यांच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. गेल्या दहा दिवसात मृतांच्या संख्येत आणखी दोन रुग्णांची वाढ झाल्याने आतापर्यंत एकूण ३१८ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह संपूर्ण शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली होती. मार्च महिन्यापासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सप्टेंबर, २०२० पर्यंत कोरोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या ७४०८ इतकी होती, तर ऑक्टोबर महिन्यात १०४१ रुग्णांची भर पडली होती. चालू महिन्याच्या गेल्या १० दिवसांत केवळ ८२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्ण ८५३१ झाले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी झालेले असतानाच बरे होण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. सप्टेंबर महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३८ होते, तर त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात आणखी वाढ होऊन ते ९३.२६ टक्के इतके झाले. गेल्या १० दिवसात रुग्ण पॉझिटिव्ह मिळण्याचे प्रमाण कमी झालेले असतानाच बरे होण्याचे प्रमाणही ९४.४७ टक्के इतके आहे.

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधित २६३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यूचे प्रमाण ३.५५ होते. मात्र, ऑक्टोबर महिन्यात ५३ कोरोनाबाधित रुग्ण मृत झाल्याने एकूण मृतांची संख्या ३१६ झाली आहे. रुग्ण मिळण्याच्या प्रमाणात घट झालेली असल्याने मृतांच्या टक्केवारीमध्ये वाढ होऊन प्रमाण ३.७७ टक्के झाले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या गेल्या १० दिवसांत कोरोनाने केवळ २ रुग्णांचा बळी घेतल्याने मृतांची संख्या ३१८ झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा कहर आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यामध्ये आरोग्य विभागाला यश आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता केवळ ५९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राजापूर तालुक्यात सध्या एकही रूग्ण नाही. आता कोरोना निर्मूलनाच्या दिशेने जिल्ह्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूRatnagiriरत्नागिरी