शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

रूग्णसंख्या कमी होतानाच कोरोनाबाधितांचे मृत्यूही घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 1:50 PM

coronavirus, death, ratnagirinews ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाच मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात जिल्हाभरात केवळ ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचे प्रमाण ३.७४ टक्के इतके झाल्याने त्यांच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. गेल्या दहा दिवसात मृतांच्या संख्येत आणखी दोन रुग्णांची वाढ झाल्याने आतापर्यंत एकूण ३१८ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

ठळक मुद्देसप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात निम्म्याहून कमी बळीआरोग्य विभागाला मोठे यश, ताण झाला कमी

रहिम दलालरत्नागिरी : ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असतानाच मृत्यूचे प्रमाणही कमी झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात जिल्हाभरात केवळ ५३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचे प्रमाण ३.७४ टक्के इतके झाल्याने त्यांच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. गेल्या दहा दिवसात मृतांच्या संख्येत आणखी दोन रुग्णांची वाढ झाल्याने आतापर्यंत एकूण ३१८ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढला होता. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह संपूर्ण शासकीय यंत्रणेची धावपळ उडाली होती. मार्च महिन्यापासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सप्टेंबर, २०२० पर्यंत कोरोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या ७४०८ इतकी होती, तर ऑक्टोबर महिन्यात १०४१ रुग्णांची भर पडली होती. चालू महिन्याच्या गेल्या १० दिवसांत केवळ ८२ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण रुग्ण ८५३१ झाले आहेत.कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी झालेले असतानाच बरे होण्याचे प्रमाणही वाढलेले आहे. सप्टेंबर महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.३८ होते, तर त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात आणखी वाढ होऊन ते ९३.२६ टक्के इतके झाले. गेल्या १० दिवसात रुग्ण पॉझिटिव्ह मिळण्याचे प्रमाण कमी झालेले असतानाच बरे होण्याचे प्रमाणही ९४.४७ टक्के इतके आहे.सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कोरोनाबाधित २६३ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्यूचे प्रमाण ३.५५ होते. मात्र, ऑक्टोबर महिन्यात ५३ कोरोनाबाधित रुग्ण मृत झाल्याने एकूण मृतांची संख्या ३१६ झाली आहे. रुग्ण मिळण्याच्या प्रमाणात घट झालेली असल्याने मृतांच्या टक्केवारीमध्ये वाढ होऊन प्रमाण ३.७७ टक्के झाले. त्यानंतर नोव्हेंबर महिन्याच्या गेल्या १० दिवसांत कोरोनाने केवळ २ रुग्णांचा बळी घेतल्याने मृतांची संख्या ३१८ झाली आहे.जिल्ह्यात कोरोनाचा कहर आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यामध्ये आरोग्य विभागाला यश आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता केवळ ५९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राजापूर तालुक्यात सध्या एकही रूग्ण नाही. आता कोरोना निर्मूलनाच्या दिशेने जिल्ह्याची यशस्वी वाटचाल सुरु आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूRatnagiriरत्नागिरी