शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पशुधन अभियानास रत्नागिरीत प्रारंभ : म्हस्के

By admin | Updated: July 10, 2014 00:00 IST

राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू

रत्नागिरी : केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पशुधन अभियान सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात त्याचा शुभारंभ करण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. शिवाय गवताच्या ठोंबांचे वितरण करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस. एस. म्हस्के यांनी दिली.वैरण विकास व खाद्य योजनेंतर्गत शेतकरी, संस्था, मंडळांना एक हेक्टरपेक्षा जमीन अधिक आहेत, त्यांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाभरातून आतापर्यंत ६७ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. मात्र, १०० ते ११० प्रस्ताव जमा झाल्यास ते एकत्रित करून पाठविण्यात येणार आहेत. या प्रस्तावांना मंजुरी देण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना आहे. प्रस्ताव मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना ३० हजार ते एक लाख रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. १०० टक्के सबसिडी देण्यात येणार आहे. या निधीतून शेतकरी कुंपण, बियाणे, सिंचन, जमिनीची पातळी सुधारणे इत्यादी कामासाठी वापरू शकतात. शेतकरी स्वत:च्या जनावरांसाठी चारा ठेऊन उर्वरित चाऱ्याची विक्री करता येऊ शकते. गतवर्षी किलोला साडेतीन रूपये दर देण्यात आला होता. पडिक जमीन, कलमांच्या बागेत, भात जमिनीच्या बांधावर गवताची लागवड करण्यात येते. यावर्षी सहा लाख ‘यशवंत-जयवंत’ गवताचे ठोंब वितरीत करण्यात येणार आहे. एक लाख चार हजार गवताचे ठोंब रत्नागिरी तालुक्यात वाटप करण्यात आले. जांभरूण, वेतोशी, खरवते, मालगुंड, जाकादेवी, फणसवळे, वाटद-खंडाळा, हरचेरी, डोर्ले, पावस येथे गवताचे ठोंब वितरीत करण्यात आले.(प्रतिनिधी)