शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

फुरुस येथे डोंगर खचला

By admin | Updated: August 5, 2014 00:10 IST

ग्रामस्थ भयभीत : अनेक ठिकाणी पडझड; दिवसभर पावसाची संततधार

चिपळूण : तालुक्यात आज सोमवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. फुरुस येथे डोंगराचा काही भाग खचल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तहसीलदार वृषाली पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. १२ घरांना स्थलांतराच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ‘माळीण’ प्रकरण अद्याप ताजे असतानाच फुरुस-कदमवाडीजवळ असलेल्या डोंगराचा काही भाग खचल्यामुळे येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. कदमवाडीपासून १ कि.मी. अंतरावर २००५ मध्ये डोंगर खचला होता. याच डोंगराचा काही भाग आज खचला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या डोंगरावर पूर्ण जंगल आहे. ग्रामस्थांकडून माहिती मिळताच तहसीलदार वृषाली पाटील, मंडल अधिकारी एम. व्ही. मिसाळ, तलाठी डी. एस. सरगर-माने यांनी ग्रामस्थांसह घटनास्थळी भेट दिली.सध्यातरी घाबरण्यासारखी स्थिती नाही. परंतु, कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी तेथे असणाऱ्या १२ घरांना स्थलांतराच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ही घरे नवीन आहेत.रात्रीच्यावेळी ग्रामस्थांनी घरात न झोपता गावात इतर ठिकाणी किंवा नातेवाईकांकडे रहावे, असे सूचविण्यात आले आहे. ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, या भागाची भूगर्भ तज्ञांकडून पाहणी करण्यात येईल, असेही तहसीलदार पाटील यांनी सांगितले. सकाळी १० नंतर पावसाची संततधार सुरू झाली. ती दिवसभर सुरूच होती. पावसामुळे दहिवली खुर्द गावी मनोहर सोमा चव्हाण यांचे घर कोसळून २२ हजार ६०० तर अन्नधान्याचे १२०० रुपये असे एकूण ३४ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले. याच गावातील बाबल्या बाळ्या नागले याचा गोठा कोसळून १० हजार १२० रुपयांचे नुकसान झाले. नांदगाव येथे शंकर भिकाजी शिंदे यांच्या घराचे पत्रे उडून १५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, एस. टी. महामंडळ व महसूल खात्यातर्फे दरडी कोसळणारी ठिकाणे व पूर येणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली जात आहे. शासकीय यंत्रणा कोणताही धोका होऊ नये, यासाठी सतर्क आहे. (प्रतिनिधी)--डोंगराच्या पायथ्यालगत असलेल्या १२ नवीन बांधलेल्या घरांना स्थलांतराच्या नोटीस --भूगर्भ शास्त्रज्ञांकडून करणार पाहणी, तहसीलदार वृषाली पाटील यांनी केली पाहणी