शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

माॅर्निंग वाॅक आराेग्यासाठी की काेराेना घरात आणण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:30 IST

अरुण आडिवरेकर लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. काेराेना नियंत्रणात आणण्यासाठी ...

अरुण आडिवरेकर

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने लाॅकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. काेराेना नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंध लादण्यात आले असले तरी माॅर्निग वाॅकसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही. रत्नागिरी शहरासह आजूबाजूच्या परिसरात अनेकजण माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडत आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई हाेत नसल्याने तेही बिनधास्त झाले आहेत.

काेराेनाचा संसर्ग अजूनही कमी झालेला नाही. हवेतून वेगाने पसरणाऱ्या या संसर्गापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी संचारबंदी जाहीर करण्यात आली असून, नागरिकांना घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. केवळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, माॅर्निंग वाॅकची सवय पडलेले अनेकजण अजूनही घराबाहेर पडत आहेत. शहरातील मांडवी, थिबा पॅलेस, साळवी स्टाॅप, हिंद काॅलनी याबराेबरच नाचणे, शिरगाव, उद्यमनगर या भागात माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तरुणांसह ज्येष्ठ, महिलांही फिरायला बाहेर पडत आहेत. अनेकजण ताेंडाला मास्क न लावता तर काहीजण हनुवटीला मास्क लावून फिरत असतात. त्यामुळे काेराेनाचा संसर्ग वाढण्याची भीती अधिक आहे.

पाेलिसांकडूनही सूट

काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. संचारबंदीच्या काळात अनावश्यक फिरणाऱ्यांवर पाेलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. पण, ही कारवाई मर्यादित वेळेतच केली जात आहे, तर दुकानांसाठी ठरवून दिलेल्या वेळेत केवळ दुकानांची पाहणी करण्यात येते. पण माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडणारे पाेलिसांच्या कारवाईतून सुटत आहेत. अनेकजण अंतर्गत मार्गाचा वापर करत असल्याने तेही वाचतात.

सकाळच्या प्रसन्न वातावरणात शुद्ध हवा घेण्यासाठी अनेकजण माॅर्निंग वाॅकसाठी बाहेर पडतात. सध्या काेराेनाचा संसर्ग इतका वाढला आहे की, हवेबराेबर काेराेनाचा विषाणू शरीरात जाण्याचा धाेका अधिक आहे. त्यामुळे खुली हवेपेक्षा विषाणूच शरीरात जाऊ शकताे.

काेराेनाची भीती तर आहेच. पण, घरात बसून सांधे जखडतात. दिवसभर घरात बसून कंटाळाही येताे. सकाळच्या वेळेत गर्दीचे प्रमाण कमी असते. त्यामुळे पाय माेकळे करण्यासाठी घराबाहेर पडताे. ताेंडाला मास्क लावूनच बाहेर पडताे आणि घरात जाण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवूनच जाताे.

- ज्येष्ठ नागरिक

काेराेनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे भीतीही आहेच. आपण बाधित झालाे तर घरातील मंडळींचे काय हाेईल, याची चिंता असतेच. पण, सकाळी फिरायला येणाऱ्यांची खूपच कमी असते. त्यामुळे संसर्ग हाेण्याचा धाेका कमी आहे. त्यातही घरापासून जास्त दूर जाणे टाळताे. याेग्यती खबरदारी घेऊनच आपण घराबाहेर पडताे.

- नागरिक