शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासासाठी कारणेच अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:30 IST

मेहरुन नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले असून जिल्हाबंदी लागू केली आहे. सामान्य ...

मेहरुन नाकाडे

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले असून जिल्हाबंदी लागू केली आहे. सामान्य प्रवाशांना अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास नाकारला आहे. जिल्ह्याबाहेरील प्रवासाला ‘ई’ पास आवश्यक केला आहे. राज्य परिवहन महामंडळाची सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील १५ टक्के तर ३५ टक्के सर्वसामान्य प्रवासी प्रवास करीत आहेत. प्रवासासाठी कारणेही अनेक सांगत आहेत.

कोर्टात केस आहे, डाॅक्टरांकडे जायचे आहे, नातेवाईक आजारी आहेत, औषधे संपली आहेत, अंत्यविधीला जायचे आहे, पोलीस स्थानकात काम आहे आदी विविध कारणे सांगून एसटीतून सर्वसामान्य प्रवासी प्रवास करीत आहेत. काही प्रवासी डाॅक्टरांची फाइल जवळ ठेवत आहेत. तर काही कोर्टाची जुनी कागदपत्रे ठेवत आहेत. वाहकांने गाडीत बसण्यास मज्जाव केला तर चक्क्क हुज्जत घालत आहेत.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय एसटीत अन्य प्रवाशांना परवानगी देऊ नये, अशी सूचना एसटी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. काही आगारांमध्ये काटेकाेरपणे सूचनांचे पालन करण्यात येत आहे. मात्र काही आगारांतून चालक-वाहकांना सूचना नसल्याने, रिकामी एसटी धावण्यापेक्षा प्रवाशांना गाडीत घेतले जात आहे. काही मार्गांवर तर मासळी विक्रेतेसुद्धा एसटीतून प्रवास करीत आहेत.

महामंडळाने प्रवासी क्षमतेपेक्षा पन्नास टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली आहे. त्यानुसार एका सीटवर एकच प्रवासी बसण्यासाठी वाहक सूचना करीत असले तरी प्रवासी मात्र ऐकत नाहीत. तुम्हाला काय करायचे, आमची काळजी आम्ही घेऊ, या शब्दांत वाहकांशी वाद घालत असल्याने असे प्रवासी मात्र एसटी कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. नाइलाजास्तव प्रवासी घ्यावे लागतात.

तीच ती कारणे

- अंत्यविधीला जायचे आहे. नातेवाईक आजारी आहेत.

- डाॅक्टरांकडे उपचारासाठी जायचे आहे, औषधे संपली असल्याचे सांगून डाॅक्टरांची फाइल दाखवत आहेत.

- कोर्टात आज तारीख आहे, पोलीस स्थानकात काम आहे, सांगत जुनी कागदपत्रे पुढे केली जातात.

- प्रवासासाठी चक्क एसटीत घुसखोरी केली जाऊन वाद घातला जातो.

खंडाळा मार्गावर गर्दी

खासगी वाहतूक बंद असल्याने एसटीकडे प्रवाशांचा ओढा अधिक आहे. खंडाळा, जयगड मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या मोजकीच असली तरी अन्य प्रवासी अधिक आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांसाेबत वाद

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र असते. मात्र जिल्ह्याबाहेरील प्रवाशांकडे ई-पास असणे आवश्यक आहे. मोजक्या प्रवाशांकडे ई-पास असतो. अन्यथा एसटीतून प्रवास करण्यासाठी कर्मचाऱ्यांबरोबर प्रवासी वाद घालतात. मटका, दारूसाठीही प्रवास करणारी मंडळी आहेत.

एसटीमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना घेण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. सर्वसामान्य प्रवाशांकडे ई-पास असेल तर प्रवेश देण्याची सूचना करण्यात आली आहे. सर्व कर्मचारी याचे तंतोतंत पालन करीत आहेत. मात्र, काही प्रवासी डाॅक्टरांची फाइल दाखवत असल्याने प्रवाशांना गाडीत घ्यावे लागते.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी