शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे हळवे भातपीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST

रत्नागिरी : गेले तीन दिवस बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे हळव्या जातीचे भातपीक धोक्यात आले आहे. मात्र, गरवे व निमगरव्या ...

रत्नागिरी : गेले तीन दिवस बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे हळव्या जातीचे भातपीक धोक्यात आले आहे. मात्र, गरवे व निमगरव्या जातीच्या भातासाठी पाऊस चांगला आहे.

जिल्ह्यात प्रामुख्याने ७० हजार ३३४ हेक्टर क्षेत्रावर भातपीक लावण्यात आले आहे. पैकी ४० टक्के हळव्या जातीचे, ४० टक्के निमगरवे तर २० टक्के गरव्या जातीच्या भाताची लागवड करण्यात आली आहे. पैकी हळव्या जातीचे भात काही ठिकाणी पोटरी अवस्थेत आहे, तर काही ठिकाणी फुलोऱ्यात आले आहे.

त्याचबराेबर पसवलेल्या भाताने लोंब्या टाकल्या असून त्या दुधावस्थेत आहेत. त्यामुळे मुसळधार पावसामुळे फुलोरा झडून जाण्याची शक्यता आहे. पसवलेल्या भातामध्ये दाणा तयार झालेला नाही. अति पावसामुळे दाणा काळपट पडून पोचट होणार आहे. सलग दोन आठवडे कडाक्याच्या उन्हामुळे कोरड्या झालेल्या भातखाचरात पावसाचे पाणी साचले आहे. कडक उन्हामुळे वाळत आलेल्या पिकाला त्यामुळे जीवदान मिळाले आहे.

वास्तविक, यावर्षी लवकर झालेल्या पावसामुळे भातलागवड वेळेवर पूर्ण झाली. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाने बऱ्यापैकी उसंत घेतली होती. कडक उन्हामुळे काही ठिकाणी भातपिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. निळे फुंगेरे, काटेरी भंगेरे तसेच पाने गुंडाळणारी अळी यांचा प्रादुर्भाव झाला होता. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक कीटकनाशकांच्या फवारण्या करून कीडरोग आटोक्यात आणला आहे.

मुसळधार पावसामुळे हळव्या भातपिकावर परिणाम झाला आहे. पावसाचे प्रमाण सतत राहिले तर मात्र हळवे भातपीक धोक्यात येईल, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.