शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
3
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
4
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
5
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
6
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
7
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
8
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
9
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
10
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
11
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
12
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
13
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
14
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
15
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
16
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
17
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
18
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
19
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
20
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन

फसल पीक विमा योजनेकडे पाठ, रत्नागिरी जिल्ह्यातील १२१४ शेतकऱ्यांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 3:44 PM

रत्नागिरी जिल्ह्यात फळपीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत असताना खरीप हंगामात शेतकऱ्यांची विमा योजनेप्रती अनास्था असलेली निदर्शनास येत आहे. गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील १२१४ शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांची संख्या वाढली असून, १९९९ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. खरीप हंगामासाठी ५६ हजार ६९ शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे. पंतप्रधान फसल पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.

ठळक मुद्देखरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : जिल्ह्यात फळपीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभत असताना खरीप हंगामात शेतकऱ्यांची विमा योजनेप्रती अनास्था असलेली निदर्शनास येत आहे. गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील १२१४ शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकऱ्यांची संख्या वाढली असून, १९९९ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. खरीप हंगामासाठी ५६ हजार ६९ शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले आहे. पंतप्रधान फसल पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे.हवामानातील सातत्यपूर्ण बदलामुळे पिकाच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याने शेतऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. परिणामी विमा योजनेव्दारे पिकासाठी केलेला खर्च तरी किमान भरून निघावा, यासाठी शासनाने खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत भात व नाचणी पिकाचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कुळाने किंवा भाडेपट्ट्याने शेती करणाऱ्यांना शेतकऱ्यांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. पीक विमा योजनेत सहभाग घेतल्यानंतर पिकांना विमा संरक्षण मिळते. पीक पेरणीपासून कापणीपर्यंतच्या कालावधीत उत्पादनात येणारी घट पीक पेरणीपूर्व लावणीपूर्व नुकसानभरपाई निश्चित करणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसानभरपाई निश्चित करणे, काढणीपश्चात नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्ती यामुळे पिकाचे नुकसान याची दखल घेण्यात येते.यावर्षी या योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता इफ्को टोकियो इन्सुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. सुरुवातीला २३ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, शेतकऱ्यांच्या अल्प प्रतिसादामुळेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ४ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

गतवर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील १२१४ शेतकऱ्यांनी लाभ घेतला होता. ६६६.१ हेक्टर क्षेत्राचा विमा काढला होता. संबंधित क्षेत्राची विमा संरक्षित रक्कम २ कोटी ५९ लाख ७६ हजार ८४७ असताना विमा हफ्त्याची ५ लाख १९ हजार ५७६.३ इतकी रक्कम शेतकऱ्यांनी जमा केली होती.गतवर्षी भात पिकासाठी प्रतिहेक्टरी ३९००० रूपये मिळून २ कोटी ५९ लाख ७६ हजार ८४७ इतकी विमा संरक्षित रक्कम शेतकऱ्यांना मिळाली होती. यावर्षी एकूण १९९९ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेसाठी प्रस्ताव सादर केला असून, ५६२ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षणाखाली आले आहे. शेतकऱ्यांनी ४ लाख ७१ हजार ७०५ रूपये विमा संरक्षित रक्कम भरली असून, त्यासाठी २ कोटी ३५ लाख ८५ हजार ३१७ रूपयांचा परतावा मिळणे अपेक्षित आहे.मुख्य पीक भातजिल्ह्याचे मुख्य पीक भात असून, फळबाग लागवडही मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. कमी श्रमात अधिक उत्पन्न घेण्याच्या दृष्टीने शासनाकडून विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यात ७० हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. दुय्यम पीक म्हणून नागली लावण्यात येते. १४ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड केली जाते. ८०९ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, ११८० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला तसेच ९१३० हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य, गळितधान्य १०० हेक्टर क्षेत्रावर लावण्यात येते.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाRatnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी