शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना न्याय

By admin | Updated: August 1, 2015 00:36 IST

समाधान : गुहागर नगरपंचायतीला प्राप्त झाला संचालनालयाचा आदेश

गुहागर : गुहागर नगरपंचायतीची स्थापना २०१२ला झाली असली तरी अद्याप गुहागर व असगोली ग्रामपंचायतीमधील कर्मचारी जुन्या वेतन श्रेणीवर काम करत आहेत. नगर परिषद संचालनालयातर्फे या कर्मचाऱ्यांना नगरपंचायती निकषाप्रमाणेवेतनश्रेणीसह सर्व फायदे मिळण्याबाबतची सूचना मेलद्वारे प्राप्त झाल्याने या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.गुहागरचे आमदार व पालकमंत्री भास्कर जाधव हे नगरविकास राज्यमंत्री असताना २०१२मध्ये नगरपंचायतीची स्थापना झाली. गुहागर शहराच्या कमी लोकसंख्येमुळे असगोली ग्रामपंचायत यामध्ये समाविष्ट करण्यात आली. असगोली गावातून याला ठाम विरोध झाला. नगरपंचायत स्थापन होताना येथील आमदारच नगरविकास राज्यमंत्री असल्याने स्थापनेवेळी जिल्ह्यातील लांजा व देवरुख याच्यापेक्षाही अधिकचा निधी गुहागर नगरपंचायतीकडे वर्ग करण्यात आला. गुहागर हे तालुक्याचे ठिकाण व पर्यटनदृष्ट्या प्रगत शहर असल्याने नगरपंचायतीकडून जनतेच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सुरुवातीची दोन वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे तत्कालीन तहसीलदार जीवन कांबळे व त्यानंतर नायब तहसीलदार सुहास थोरात यांच्याकडे होती. नव्याने आलेले नगरसेवक यांना नगरपंचायत कामकाजाचा अनुभव नसल्याने कामकाज संथगतीने सुरू होते. काही महिन्यांपूर्वीच मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी नगरपंचायतीची सूत्र हाती घेतल्यानंतर आता कामकाजाला गती मिळत आहे, असे असले तरी नगरपंचायतीमधील कर्मचारीवर्ग हा ग्रामपंचायत काळातील मर्यादित आहे. सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्री याबाबत कोणतीही कारणे न दाखवता दिवस-रात्र काम करताना दिसत आहेत. नगरपंचायतीला अडीच वर्षे होऊन गेल्याने या कर्मचाऱ्यांना कायम करुन नव्या निकषाप्रमाणे वेतन व सुविधा मिळाव्यात, यासाठी यापूर्वीच मागणी करण्यात आली होती.सध्या ग्रामपंचायतीपासूनचे जुने २२ कर्मचारी कार्यरत असून, नव्याने नगर परिषद संचालनालयाने दिलेल्या मंजुरीमध्ये ३१ लोकांच्या स्टाफला मंजुरी देण्यात आली आहे. याबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर आणखी नऊ कर्मचारी नव्याने भरले जाणार आहेत. यासाठी लिपिक, पंप आॅपरेटर आदी श्रेणी- ३ची पदे जिल्हाधिकारी भरतील, तर श्रेणी चारची पदे नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांतर्फे भरली जाणार आहेत. याबाबतची कार्यवाही आता सुरु झाली असून, वरिष्ठ पातळीवरून आवश्यक प्रशासकीय पूर्तता झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांना नगरपंचायत निकषाप्रमाणे वेतन व सुविधा मिळणार असल्याने कर्मचारीवर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)तीन वर्षांनंतर न्याय...गुहागर नगरपंचायत स्थापन झाली त्यावेळी लोकसंख्येचा निकष महत्त्वाचा मानण्यात आला होता. २०१२ साली नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर आजपर्यंत हे कर्मचारी पूर्वीच्या वेतनश्रेणीवर काम करीत होते. आता नव्या आदेशानुसार त्यांना सुधारित वेतन मिळेल. नगरपरिषद संचालनालयामार्फत हे आदेश प्राप्त झाल्याचे आज सांगण्यात आले. नगरपंचायत निकषाप्रमाणे मिळणाऱ्या श्रेणी आता लागू होणार आहेत. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.