शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

"दिल्लीतील भाजपा नेत्यांनीच फडणवीसांचा काटा काढला"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2020 15:16 IST

Vinayak Raut, Devendra Fadnavis, Narayan Rane, Ratnagiri दिल्लीतील भाजप नेत्यांनाच फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको होते. त्यांना मी पणाचा जो गर्व चढला होता आणि दिल्लीत नेतृत्वाची स्वप्ने पडत होती. त्यामुळेच दिल्लीतील नेत्यांनी त्यांचा काटा काढला, असा गौप्यस्फोट त्यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देभाजपच्या दिल्लीतील नेत्यांनीच फडणवीस यांचा काटा काढलाखासदार विनायक राऊतांचा हल्लाबोल, राणे यांच्यावरही टीका

चिपळूण : भाजपमधील देवेंद्र फडणवीस पुरस्कृत टवाळखोरांची विकृतबुद्धी महाराष्ट्र आणि राज्य सरकारची बदनामी करत आहे. सत्ता हातातून गेल्याने त्यांचा जळफळाट झाला आहे. त्यामुळेच ते असे विकृत चाळे करत आहेत, अशा शब्दात खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर टीका केली.

दिल्लीतील भाजप नेत्यांनाच फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको होते. त्यांना मी पणाचा जो गर्व चढला होता आणि दिल्लीत नेतृत्वाची स्वप्ने पडत होती. त्यामुळेच दिल्लीतील नेत्यांनी त्यांचा काटा काढला, असा गौप्यस्फोट त्यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.राऊत पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. कोविडसारख्या संकटात महाविकास आघाडी सरकारने अतिशय उत्तम काम केले. राज्यात जी आरोग्य व्यवस्था उभारली गेली आणि कोविडवर नियंत्रण मिळवले गेले. त्याची दखल जगाने घेतली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कामाचे कौतुक केले आहे. कोविड काळात राज्याची आर्थिक घडी विस्कटली असली तरी ठाकरे सरकारने त्यातून मार्ग काढत राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. लवकरच महाराष्ट्र पूर्वपदावर येईल, असेही ते म्हणाले.प्रत्यक्षात दिल्लीतील भाजप नेत्यांना फडणवीस मुख्यमंत्रीपदी नको होते. संघ आणि भाजपमध्ये मी पणाची भाषा चालत नाही. त्यांच्या प्रत्येक वाक्यात 'आम्ही' हा शब्द असतो. परंतु देवेन्द्र फडणवीस यांनी थेट 'मी' पणाची भाषा सुरू केली होती. त्यांना केंद्रीय नेतृत्त्वाचे स्वप्न पडू लागले होते. हे दिल्लीतील नेत्यांना रुचले नाही. त्यामुळेच त्यांनी फडणवीस यांचा काटा काढला, असे खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.

नारायण राणे नेहमीच पडत असतातनारायण राणे यांनी महाराष्ट्र सरकार लवकरच कोसळेल, असे वक्तव्य केले होते. त्याचा समाचार घेताना खासदार राऊत म्हणाले की, नारायण राणे नेहमीच अशी भविष्यवाणी करत असतात. गेले कित्येक वर्षं आम्ही ऐकतोय. सरकार पडेल असे ते नेहमीच बोलत असतात. मात्र सरकार पडत नाही. परंतु नारायण राणे नेहमीच पडत असतात. त्यामुळे त्यांच्या या बकवासगिरीला आम्ही कवडीचीही किंमत देत नाही. देवेंद्र फडणवीसांना खुश करण्यासाठी आणि आपले अस्तित्व जपण्यासाठी ते राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खोटेनाटे आरोप करत आहेत.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणेRatnagiriरत्नागिरीBJPभाजपाShiv Senaशिवसेना