शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

भव्यदिव्य मानवी साखळीतून साकारला निवडणूक आयोगाचा लोगो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 18:40 IST

रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी रविवारी (7 एप्रिल) मानवी साखळीद्वारे भारत निवडणूक आयोगाचा लोगो तयार केला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी रविवारी (7 एप्रिल) मानवी साखळीद्वारे भारत निवडणूक आयोगाचा लोगो तयार केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर विविध शाळा महाविद्यालयांमधील २८०० हून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांनी मानवी साखळी द्वारे हा लोगो तयार केलानेत्रदीपक अशा या सोहळयाच्या निमित्ताने स्वीप (SVEEP) अंतर्गत मतदार जागृतीचा एक कार्यक्रम सादर करण्यात आला.

रत्नागिरीरत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी रविवारी (7 एप्रिल) मानवी साखळीद्वारे भारत निवडणूक आयोगाचा लोगो तयार केला आहे. लोगो तयार करून मतदानाचा संदेश देताना एक विक्रम घडवला आहे असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर विविध शाळा महाविद्यालयांमधील २८०० हून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक यांनी मानवी साखळी द्वारे हा लोगो तयार केला आहे. नेत्रदीपक अशा या सोहळयाच्या निमित्ताने स्वीप (SVEEP) अंतर्गत मतदार जागृतीचा एक कार्यक्रम सादर करण्यात आला. शिस्तबद्ध रित्या शाळकरी मुले आणि मुलींनी मैदानावर आयोगाचा लोगो साकारला आहे. हा उपक्रम बघण्यासाठी शेकडो नागरिक स्टेडियमवर उपस्थित होते.

स्वीप कार्यक्रमाच्या प्रमुख असलेल्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाची भव्यता साधारण कॅमेऱ्यात न मावणारी होती, त्यामुळे प्रशासनातर्फे याच्या चित्रीकरणासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आला. या कार्यक्रमात सर्वांसोबत जिल्हाधिकारी व निवडणुक निर्णय अधिकारी देखील मानवी साखळीत सामील झाले होते. 

कार्यक्रमात सेंट थॉमसच्या बँडने सुरेल धून कार्यक्रमात सादर करण्यात आल्या. पथनाट्याचे सादरीकरण यावेळी झाले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कोअर कमिटी करण्यात आली होती. या कमिटीत मंदार सावंत, संध्या सावंत, रुपेश पंगेरकर, इम्तियाज शेख, किरण जोशी, कृष्णा गावडे, नाना पाटील, निलेश पावसकर, विनोद मयेकर,  शशिकांत कदम, राजेंद्र कांबळे, आगा सर, विश्वेश टिकेकर ढवळे यांचा समावेश होता. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी सर्व उपस्थितींना मतदाराची शपथ दिली. दीड तास चाललेल्या या अविस्मरणीय सोहळ्याची  सांगता वंदे मातरमने झाली. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीElectionनिवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग