शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाढीचा दर कमी होतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क राजापूर : गतवर्षी कोरोना संसर्गापासून दूर असणारा राजापूर तालुका कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र रुग्णसंख्येत गतिमान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : गतवर्षी कोरोना संसर्गापासून दूर असणारा राजापूर तालुका कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र रुग्णसंख्येत गतिमान राहिला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तालुक्यातील रुग्णसंख्या बऱ्याच प्रमाणात मंदावली असून, रुग्णसंख्या वाढीचा दर घटला आहे.

गतवर्षी कोरोना संक्रमणाबाबत राजापूर शहर आणि संपूर्ण तालुका कायम ‘सेफ झोन’ म्हणून ओळखला जात होता. तालुक्यातील सुमारे ९५ टक्के गावांनी कोरोनाला गावात प्रवेशच दिला नव्हता. मात्र, यावर्षी मार्च महिन्यापासून आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यात मृत्यूंचे प्रमाणही वाढले. सध्या राजापूर तालुक्यात कोरोनाचे ३३२ रुग्ण ॲक्टिव्ह असून, एकूण रुग्णसंख्या ४,५६१ एवढी झाली आहे.

राजापूर तालुक्यात आजपर्यंत सापडलेल्या ४,५६१ कोरोना रुग्णांपैकी ४,०५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तालुक्यातील १७६ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील कोरोना रुग्णवाढीचा दर चांगलाच आटोक्यात आला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांनी आपल्या आरोग्याची काळजी मोठ्या प्रमाणात घेतली होती. पुणे, मुंबईसारख्या महानगरांतून येणाऱ्या चाकरमान्यांचे १४ दिवसांचे अलगीकरण करण्यात येत होते. त्यावर ग्राम कृती दल आणि आरोग्य विभागाने लक्ष ठेवले होते. त्यामुळे १४ दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय कुणालाही इतरांमध्ये मिसळता येत नव्हते.

यावर्षी दुसऱ्या लाटेमध्ये नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे काटेकोर पालन केलेले नसल्याने त्याचा परिणाम कोरोना रुग्णसंख्या वाढण्यात झाला. शिमग्यापासून रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. मार्च महिन्यात आलेल्या दुसऱ्या लाटेमध्ये सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणावर बेफिकिरी दिसून आली. प्रशासनही अनेक नियमांकडे दुर्लक्ष करत होते. यावर्षीची लग्नसराई राजापूर तालुक्यासाठी कोरोना रुग्णसंख्येत वाढ करणारी ठरली. मुंबई, पुण्यातून येणारे चाकरमानी यावर्षी विलगीकरणात न राहता आपापल्या कुटुंबात मिसळल्याने कोरोना संक्रमण अधिक झाले. या दुसऱ्या लाटेमध्ये शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले. यावेळी मृत्यूंचे प्रमाणही वाढले. त्यातच सर्व वयोगटातील लोक मृत्यूमुखी पडत असल्याने अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली.

राजापूर तालुका

एकूण रुग्ण ४,५६१

कोरोनामुक्त ४,०५३

मृत्यू १७६

सक्रिय रुग्ण ३३२

गृह अलगीकरण २३२

संस्थात्मक ०