शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाई देण्याबाबत शासन उदासिन

By admin | Updated: March 25, 2015 00:46 IST

उत्पादक संघाची खंत : आंबा उत्पादक सहकारी संस्थेतर्फे सरकारला जाब

रत्नागिरी : अवकाळी पाऊस व हवामानात सातत्याने होणारे बदल, यामुळे जिल्ह्यातील आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आंबा उत्पादक शेतकरी यामुळे उद्ध्वस्त झाला आहे. तरीही शासन नुकसान भरपाई देण्यास उदासीन असल्याची खंत रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक सहकारी संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आली आहे.आंबा, काजू हंगामाला माहे नोव्हेंबरपासून फवारणी करावी लागते. नोव्हेंबर ते मार्च महिन्यांमध्ये पाऊस पडला. त्यामुळे उत्पादकांना परत परत फवारणीची कामे करावी लागली. परिणामी फवारणीसाठी दुप्पट खर्च करावा लागला आहे. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये झाडांना आलेला मोहोर मोठ्या प्रमाणात होता. शिवाय उत्पादकांना दिलासा देणारा होता. मोहोराला कणीएवढी फळधारणा झाल्यावर अचानकपणे तीन दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळल्याने मोहोर कुजला. त्यामुळे बुरशीसारख्या रोगांनी मोहोरातील कणी खराब होऊन झडून गेल्याने आंबा पिकाचे नुकसान झाले.शासकीय कृषी खात्यातर्फे पिकाचा पंचनामा सुरू आहे. ७० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. आंबा पिकाची ही दयनीय अवस्था आंबा उत्पादक संस्थेने शासनाच्या लक्षात आणून दिली आहे. परंतु, शासन याबाबत संवेदनशील दिसत नाही. अजूनही नुकसानात गेलेल्या आंबा उत्पादकांना कोणत्या प्रकारे शासन मदत करणार आहे, याचा अंदाजच बांधता येणे अवघड झाले आहे. शासकीय उदासीन धोरणाबाबत आंबा उत्पादकातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.आंबा पिकाला हेक्टरी नुकसान भरपाईचा फायदा होणार नाही. हा निकष आंबा पिकाला अयोग्य आहे. आंबा पिकासाठी उत्पादकांना मोठा खर्च करावा लागतो. यावर्षी उत्पादनावरील खर्चसुध्दा भागणार नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्पादकांना सावरण्यासाठी शासनाने आर्थिक मदतीची घोषणा करून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हा आंबा उत्पादक संस्थेतर्फे करण्यात आली आहे.जिल्हा आंबा उत्पादक संघाने कोकणातील आंबा नुकसानग्रस्तांना मिळणाऱ्या भरपाईबाबत शासन दाखवत असलेल्या उदासिन धोरणाबद्दल संताप व्यक्त केला आहे. बागायतदार यातून सावरला नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)