शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

हरचिरी - कदमवाडी येथील गटाराच्या कामात गाेलमाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST

रत्नागिरी : तालुक्यातील हरचिरी ग्रामपंचायतीतर्फे अनुसूचित जाती व नवबाैद्ध घटकांच्या विकास कार्यक्रमांतर्गत हरचिरी - कदमवाडी येथे गटाराचे काम करण्यात ...

रत्नागिरी : तालुक्यातील हरचिरी ग्रामपंचायतीतर्फे अनुसूचित जाती व नवबाैद्ध घटकांच्या विकास कार्यक्रमांतर्गत हरचिरी - कदमवाडी येथे गटाराचे काम करण्यात आले आहे. या कामासाठी ४.९९ लाख खर्च करण्यात आल्याचा फलक लावण्यात आला आहे. मात्र, या कामात गाेलमाल झाल्याचा आराेप येथील ग्रामस्थ शंकर नारायण कदम यांनी केला आहे. त्यांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.

हरचिरी ग्रामपंचायतीतर्फे अनुसूचित जाती व नवबाैद्ध घटकांच्या वस्तीचा विकास कार्यक्रमांतर्गत हरचिरी - कदमवाडी नं. १ येथे गटाराचे काम करण्यात आले आहे. या कामावर ४.९९ लाख रुपये खर्ची घालण्यात आले आहेत. मात्र, या कामाचा दर्जा अत्यंत हीन असून, त्याबाबत केलेले करारपत्रही दिशाभूल करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या करारपत्रावर काेणतीही तारीख नसून, साक्षीदारांची नावे घालण्यात आलेली आहेत. पण, त्यावर त्यांच्या सह्या नसल्याचे शंकर कदम यांनी म्हटले आहे. ज्या कामावर लाखाे रुपये खर्च झाले आहेत, ते काम ४० ते ५० हजारापर्यंतच झाल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. या कामाबाबत ग्रामपंचायतीकडे विचारणा केल्यानंतर काम पू्र्ण झाल्याचा लावण्यात आलेला फलकही काढून टाकण्यात आल्याचे या तक्रार अर्जात म्हटले आहे.

या कामाबाबत नाेव्हेंबर २०२०मध्ये तक्रार करण्यात आली हाेती. त्यानंतर २२ फेब्रुवारी २०२१ रोजी गटविकास अधिकारी यांनी चाैकशीसाठी कार्यालयात बाेलावले हाेते. मात्र, या कामाची चाैकशी प्रत्यक्ष जागेवर हाेणे गरजेचे हाेते. तसे न करता ती नंतर करू, असे सांगण्यात आले. त्यानंतर दाेन महिन्यांचा कालावधी उलटला तरी त्यांच्याकडून कामाची पाहणी करण्यात आलेली नसल्याचे शंकर कदम यांनी सांगितले. गटविकास अधिकारी केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा आराेपही त्यांनी या तक्रार अर्जात केला आहे.

या वाडीसाठी आलेला निधी याच वाडीत खर्च करण्यात यावा, असे त्यांनी म्हटले आहे. गटराच्या कामात उरलेल्या निधीतून वाडीत पथदीप लावावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

.............................

...तर बेमुदत उपाेषण

आपण सामाजिक बांधिलकी म्हणून गेले ८ - ९ महिने शासनाकडे याबाबत दाद मागत आहोत. त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. या कामाची सखाेल चाैकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शंकर कदम यांनी या तक्रार अर्जात केली आहे. याबाबत याेग्य ती कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपाेषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.