शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
2
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
3
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
4
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
5
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
6
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
7
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
8
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
9
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
10
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
11
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
12
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
13
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
14
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
15
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
16
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
17
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
18
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
19
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
20
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीपेक्षा पाणीपुरवठा योजनांवर खर्च भारी

By admin | Updated: March 30, 2015 00:17 IST

नळपाणी योजना : साडेतीन कोटीचा खर्च अन् ७४ लाखांची वसुली

रत्नागिरी : जिल्ह्यातील प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनांवर ३ कोटी ५६ लाख ९६ हजार ३७८ रुपये वर्षभरात खर्च करण्यात आले आहेत. मात्र, पाणीपट्टीच्या वसुलीतून केवळ केवळ ७४ लाख ६० हजार २६९ रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे या पाणीपुरवठा योजनांवर वसुलीपेक्षा खर्च जास्त होत असल्याने पांढरा हत्ती पोसण्याचाच हा प्रकार आहे.
जिल्ह्यात १२ प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना आहेत. त्याद्वारे हजारो लोकांची तहान भागते. या योजनांमुळे अनेक गावांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या योजनांसाठी चालू आर्थिक वर्षामध्ये ७६ लाख ६० हजार २६९ रुपये पाणीपट्टी वसूलीचे उद्दीष्ट जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने दिले आहे. मात्र, ही वसूलीही ग्रामपंचायतींना पूर्ण करता येत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे खर्च आणि वसुली यामध्ये बरीच तफावत असल्याने या नळपाणी योजना चालवणे म्हणजे पांढरा हत्ती पोसण्याचाच प्रकार होता, असे म्हटले जात आहे. या नळपाणी योजना चालवताना सध्या जिल्हा प्रशासनाची दमछाक होताना दिसत आहे.
या योजनांची थकबाकीची स्थिती पाहता मागील १५ वर्षांची थकबाकीही ग्रामपंचायतींनी वसूली केलेली नाही. २ कोटी २७ लाख ७० हजार २२० रुपये एवढी प्रचंड थकबाकी अजूनही बाकी आहे. ही वसूली कधी करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. ही वसूली करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागानेही आता लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
बारा प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांवर ब्लिचिंग पावडर, पंप दुरुस्ती, व्यवस्थापन, दूरध्वनी, वेतन, आणि योजना दुरुस्ती आदींवर हा खर्च ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात येत आहे. या योजनांवर वर्षाचा वीज देयकाचा २ कोटी ६४ लाख ५७ हजार २८२ रुपये खर्च होत आहे. ब्लिचिंग पावडरवर ६७ हजार ५०० रुपये, पंप दुरुस्तीवर ७८ हजार ५२० रुपये, व्यवस्थापनावर ५४ लाख ७५ हजार १ रुपये, दूरध्वनी ६४५१ रुपये आणि योजना दुरुस्तीवर ३६ लाख ११ हजार ६२२ रुपये असा एकूण ३ कोटी ५६ लाख ९६ हजार ३७६ रुपये खर्च करण्यात आला
आहे.
खर्च आणि पाणीपट्टी वसूली यांचे प्रमाण व्यस्त असल्याने मेळ बसवणे पाणी पुरवठा विभागाला अवघड जात आहे. मात्र, प्रत्येकाला पाणी देणे हा शासन निर्णय आहे. त्यामुळे नळपाणी योजनांवर एवढा मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो तर दुसरीकडे त्याची वसुली मात्र मोठ्या प्रमाणावर रखडली आहे. गेल्या १५ वर्षातील ही वसुली आहे. केवळ जिल्ह्यातील १२ नळपाणी पुरवठा योजना म्हणजे पांढरा हत्ती पोसण्याचा प्रकार असल्याचे म्हटले जात आहे. (शहर वार्ताहर)