शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

जास्तीचे पाणीदेखील ठरू शकते आराेग्याला अपायकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पाण्याला जीवन म्हणतात. त्यामुळे जगण्यासाठी पाणी अतिशय गरजेचे आहे. मात्र, पाण्याचे प्रमाण कमी झाले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पाण्याला जीवन म्हणतात. त्यामुळे जगण्यासाठी पाणी अतिशय गरजेचे आहे. मात्र, पाण्याचे प्रमाण कमी झाले तरी डिहायड्रेशन, मूत्रखडा, किडनीचे अन्य आजार उद्भवू शकतात. तसेच पाण्याचे प्रमाण गरजेपेक्षा अधिक वाढले तरीही शरीराला त्रासदायक होते. त्यामुळे शरीराला आवश्यक असेल तेवढेच पाणी प्यावे. पाण्याचे प्रमाण वय, वजन आणि आजाराचे स्वरूप यावर अवलंबून असते, असे मत आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

निरोगी आयुष्यासाठी पुरेसे आणि नियमित पाणी पिणे आवश्यक असते. मात्र, काही व्यक्तींना अतिशय कमी पाणी पिण्याची सवय असते. त्यामुळे अशा व्यक्तींना डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने अनेक त्रास होतात. तर काहींना प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिण्याची सवय असते. मात्र, गरजेपेक्षा अधिक पाणी प्यायल्यासही ते त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे अशांना वारंवार लघवीला जाणे, त्यामुळे झोपेत खंड पडणे आदी त्रास होतात. त्यामुळे पाण्याची गरज ही व्यक्तीचे वय, वजन आणि आजार असेल तर त्या आजाराचे स्वरूप यावर अवलंबून असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

शरीरात पाणी कमी पडले तर...

शरीराला नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाण्याची गरज असते. मात्र, हे पाणी आवश्यकतेपेक्षा कमी झाले तर मात्र, निर्जलीकरण (डिहायड्रेशन) चा त्रास होतो. यामुळे घशाला कोरड पडणे, सतत घाम येणे, डोके - अंग दुखणे, लघवी कमी प्रमाणात व पिवळसर रंगाची होणे, जळजळ होणे, डोळ्यांमध्ये रखरखीतपणा जाणवणे, त्वचा काेरडी पडणे, चक्कर येणे, अशक्तपणा यासारखे त्रास बळावतात. त्याचबरोबर मूत्रखडा आदींसारखे मूत्राशयाचे विकारही वाढण्याचा धोका संभवतो.

शरीरात पाणी जास्त झाले तर...

निरोगी आयुष्यासाठी दिवसभरात आठ ग्लास पाणी प्यावे. साधारणत: दोन ते अडीच लीटर पाणी नियमित पिणे गरजेचे असते. पाण्याचे प्रमाण हे वातावरणावरही अवलंबून असते. आपल्या वजनामध्येही ६० टक्के पाणी असते. त्यामुळे अधिक प्रमाणात पाणी घेतल्यास आणि ते शरीरात साठून राहिल्यास रक्तातील अनेक घटक पातळ करते. त्यामुळे शरीराची हानी होऊ शकते. पाणी बाहेर टाकण्याची प्रक्रिया योग्यरित्या न झाल्यास वजन वाढण्याचा धोका वाढतो.

काेणी किती प्यावे पाणी

पाण्याचे प्रमाण व्यक्तीच्या वयावर तसेच बदलत्या वातावरणावर अवलंबून असते.

- पाण्याच्या प्रमाणाबरोबरच आपण द्रवस्वरूपात घेतले जाणारे पदार्थही लक्षात घ्यायला हवेत.

- द्रवस्वरूपातील घटक घेतल्यास पाण्याचे प्रमाण गरजेनुसार ठेवले जावे.

- १५ वर्षांपर्यतच्या मुलांनी साधारणत: एक लीटर पाणी प्यायला हवे.

- निरोगी असलेल्या व्यक्तींनी दिवसभरात दोन ते अडीच लीटर पाणी प्यावे.

- हृदयरोगी, मधुमेही यांनी दीड ते दोन लीटर पाणी प्यावे.

- व्यक्तीचे वय, उंची, वजन, व्यायामाची पद्धत, कामाचे स्वरूप आणि आजाराचे स्वरूप या गोष्टींवर पाण्याचे प्रमाण अवलंबून असते.