शहरं
Join us  
Trending Stories
1
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
2
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
3
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
4
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
7
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
8
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
10
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
11
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
12
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
13
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
14
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
15
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
16
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
17
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
18
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारी संचालकांना संधी देऊ नये

By admin | Updated: April 4, 2015 00:11 IST

रमेश कदम : दोन दिवसांत सीआयडीकडे तक्रार देणार

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांच्या मुलांकडून लाखो रुपये घेऊन त्यांना नोकरी देणाऱ्या भ्रष्टाचारी संचालकांना उमेदवारी देऊ नये, याप्रकरणी येत्या दोन दिवसांत आपण सीआयडीकडे तक्रार अर्ज देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेश कदम यांनी दिली. जिल्हा बँकेवर निशाणा साधण्यासाठी माजी आमदार कदम यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. जिल्हा बँकेत झालेल्या नोकरभरती प्रकरणावर त्यांनी कडाडून प्रहार केला. या नोकरभरतीची चीरफाड करताना भ्रष्टाचार कसा झाला, हे त्यांनी सविस्तर सांगितले. रमेश कदम म्हणाले की, जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकऱ्याची बँक आहे. शेतकऱ्याच्या हितासाठी व त्याच्या मुलाबाळांना न्याय मिळवून देण्यासाठी त्याची स्थापना झाली आहे. सहकाराच्या माध्यमातून सामान्य माणसाला नवी ऊर्जा मिळावी, त्याची उमेद वाढावी व त्याला आधार मिळावा, यासाठी ही बँक आहे. परंतु, या बँकेत सर्वसामान्य गरीब माणसाच्या हिताचा अजिबात विचार केला जात नाही. जिल्हा बँकेत नोकरभरती करताना संचालकांनी आपल्या मर्जीतील लोकांना व नातेवाईकांना संधी दिली, असा आरोपही कदम यांनी यावेळी बोलताना केला.काहींनी २०-२० लाख रुपये घेऊन नोकरभरती केली. आम्ही सूचवलेल्या गरीब पात्र उमेदवारांचा विचारही झाला नाही. असे पैसे घेऊन नोकरभरती करणाऱ्या संचालकांना मतदारांनी पैसे घेतल्याशिवाय मत देऊ नये किंवा चार शब्द खडसावून सुनावून मतदान करावे. भरतीसाठी उमेदवारांकडून घेतलेले पैसे मतदारांना द्यावेत. कारण पैसे घेऊन भरती करणे हा सभासदांचा अपमान आहे, असेही कदम यांनी सांगितले. सभासदांच्या जीवावर निवडून येणारे संचालक पैसे घेऊन भरती करतात हे अयोग्य आहे. हे घेतलेले पैसे संबंधित संचालकांनी नातेवाईकांना परत द्यावेत किंवा मतदारांना द्यावेत. याप्रकरणी सीआयडी चौकशी व्हावी, असेही माजी आमदार कदम यावेळी म्हणाले. आपल्याला निवडणुकीत कोणी स्पर्धक नको किंवा कोणाची अडचण होवू नये, यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना लाखो रुपयांचे कर्ज देऊन ती थकवण्यात आली आहेत. त्यामुळे मार्गातला अडसर आपोआप दूर झाला आहे. जिल्हा बँक हे भ्रष्टाचाराचे कुरण आहे. येथे वर्षानुवर्षे हा भ्रष्टाचार सुरु आहे. त्यामुळे अशा भ्रष्टाचारी उमेदवारांना उमेदवारी देऊ नये. येथे चांगले उमेदवार निवडून द्यावेत व सहकारात चांगली माणसे यावीत, अशी आपली धारणा आहे, असे ते म्हणाले.
जो संचालक भ्रष्टाचार केला नाही असे म्हणत असतील त्यानी आपण मानत असलेल्या देवासमोर नारळ ठेवून तसे स्पष्ट करावे. बँकेकडून सामान्य माणसाच्या अपेक्षा आहेत. परंतु, त्या पूर्ण होत नाहीत. शेतकऱ्यांना योग्य सहकार्य मिळत नाही म्हणून शेतकरी इतर राष्ट्रीय बँकेकडे कर्जासाठी वळले आहेत. बँकेत चांगले उमेदवार निवडून जावेत, असे पत्र चेअरमन तानाजी चोरगे यांनी सभासदांना दिले आहे. त्यामुळे ते पैसे खाणाऱ्या उमेदवारांना संधी देणार नाहीत, अशी अपेक्षा आहे, असे रमेश कदम यावेळी बोलताना म्हणाले. (प्रतिनिधी)

जिल्हा बँक आपल्या पक्षाच्या ताब्यात आहे. आपण त्याकडे लक्ष देणार का, यावर ते म्हणाले, मी सहकारात काम करीत नाही. ते माझे क्षेत्र नाही. बँक कोणत्या पक्षाची आहे हे महत्त्वाचे नाही, तर सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे. ज्यांच्या जीवावर ही बँक उभी आहे ती माणसं जगली पाहिजेत. गरीब ग्राहकांना चांगला आधार मिळाला पाहिजे आणि त्यांच्यात जागृती झाली पाहिजे, यासाठी माझा हा लढा आहे, असे कदम यांनी सांगितले.