शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वीज वाहिन्या की मृत्यूसापळा

By admin | Updated: August 1, 2014 23:20 IST

संगमेश्वर तालुका : महावितरणचा कारभार, ग्राहकांच्या जिवाचा होतोय खेळ

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील महावितरण कंपनीच्या वीज वाहिन्या धोकादायक बनल्या आहेत. गेल्या महिनाभरात तीनवेळा वीज वाहिनी तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. त्यामुळे रस्त्यावरुन चालणाऱ्यांना आपल्या डोक्यावरुन जाणारी महावितरणची वीज वाहिनी म्हणजे साक्षात मृत्यूचा सापळा भासत आहे.महावितरण कंपनीकडून वीज ग्राहकांना सुविधा मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. वीजबिल वसुली मात्र कायद्याचा बडगा दाखवून केली जात आहे. सध्या झालेल्या आॅनलाईन तक्रार सुविधेमुळे महावितरणचे काम सुलभ झाले असले तरी ग्रामीण भागातील ग्राहकांना मात्र या जाचक सुविधेमुळे आठ ते दहा दिवस अंधारात राहावे लागत आहे. तक्रारवही गायब झाल्याने ग्रामीण भागातील ग्राहकांची चांगलीच गैरसोय झाली आहे. पावसाळी हंगाम असल्याने आणि वीज लाईनभोवती वाढलेल्या झाडीची साफसफाई न झाल्याने वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या तक्रारीतही वाढ झाली आहे. कडवई परिसरातही गेले काही दिवस वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या सततच्या वीज पुरवठा खंडित होण्याने अनेक ठिकाणी वीज उपकरणे निकामी होत आहेत.कडवई आणि पंचक्रोशीला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या अनेक वर्षांपूर्वीच्या असून, महावितरण कंपनीकडून त्या बदलणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी अशाच काही ठिकाणी वीज वाहिन्या तुटून अपघात घडले होते. चालू वीज वाहिनी पडून विनायक मयेकर यांच्या रिक्षेचे नुकसान झाले होते. या रिक्षाचालकालाही महावितरणने मदतीचा हात पुढे केला नाही. कडवई बाजारपेठ येथे तर या वाहिन्यांचे धोकादायक जाळे दिसून येते. या वाहिन्यांखालचे सुरक्षा गार्डही काही ठिकाणी गंजून लोंबकळत असताना दिसून येतात. गेल्या पंधरा दिवसात कडवईतील अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटून रस्त्यावर पडण्याचे प्रकार वाढले आहेत. महावितरणला माहिती मिळेपर्यंत या वाहिन्यांमधून प्रवाह चालू असतो. अशावेळी गंभीर अपघात घडण्याची दाट शक्यता आहे. समर्थनगर येथे एकाच ठिकाणी वीज वाहिनी तुटून रस्त्यावर पडण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. अपघात होता होता एक रिक्षाचालक बालंबाल बचावला. महावितरण कंपनी सोयीसुविधांना प्राधान्य देणार का? महावितरण सर्वच गोष्टी ग्राहकांकडून खरेदी करुन घेत आहे. खराब झालेल्या वाहिन्याही ग्राहकांच्या पैशातून बदलल्या जात आहेत. मग वीजबिलात आकारले जाणारे विविध अधिभार आणि अनामत रक्कम कुणाच्या खिशात जातात, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. (वार्ताहर)