शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

Coronavirus Unlock : लॉकडाऊन टाळायचे असेल तर काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:23 IST

Coronavirus Unlock, Health, Ratnagirinews गणपती उत्सवादरम्यान रत्नागिरीत कोरोना रूग्णांची संख्या भरमसाठ वाढली होती. मात्र, आरोग्य यंत्रणेच्या अथक प्रयत्नांमुळे ही संख्या घटली. दिवाळीपूर्वी ही संख्या ४ पर्यंत कमी आली होती. मात्र, आता दिवाळीनंतर रुग्ण संख्या वेगाने वाढू लागल्याने वाढीचा दर असाच राहिला तर नाईलाजाने लॉकडाऊनची वेळ येईल, असा अंदाज आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन टाळायचे असेल तर काळजी घ्याआरोग्य विभागाचा इशारा; कोरोना अजूनही आहे

रत्नागिरी : गणपती उत्सवादरम्यान रत्नागिरीत कोरोना रूग्णांची संख्या भरमसाठ वाढली होती. मात्र, आरोग्य यंत्रणेच्या अथक प्रयत्नांमुळे ही संख्या घटली. दिवाळीपूर्वी ही संख्या ४ पर्यंत कमी आली होती. मात्र, आता दिवाळीनंतर रुग्ण संख्या वेगाने वाढू लागल्याने वाढीचा दर असाच राहिला तर नाईलाजाने लॉकडाऊनची वेळ येईल, असा अंदाज आरोग्य विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.गणेशोत्सव काळात रुग्णसंख्या भरमसाठ वाढली. मृत्युचा दरही वाढू लागला. मात्र, सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णसंख्या आटोक्यात येऊ लागली. मृत्युचे प्रमाणही हळूहळू घटू लागले. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळू लागला. आरोग्य यंत्रणाही थोडीशी ह्यरिलॅक्सह्ण झाली.मात्र, कोरोना आता गेला, असे समजून दिवाळीच्या काळात लोकांची गर्दी वाढू लागली. मास्कशिवाय लोक खरेदीसाठी फिरू लागले. योग्य शारीरिक अंतराचा विसर पडल्याने पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. परिणामी रुग्णसंख्या वाढली तर लॉकडाऊन होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.कोरोनाचा विसरगणेशोत्सवाच्या काळात कोरोनाचा वाढलेला संसर्ग आता कमी झाला आहे. मृत्यूची संख्याही शुन्यावर आल्याने कोरोना गेलाच, असे लोकांना वाटू लागले आहे. त्यामुळे सर्वत्र आता लोकांमध्ये बेफिकीरी आली आहे. मात्र, आपल्याबरोबरच घरातील गंभीर आजार असलेल्या वृद्धांना कोरोनाचा धोका अधिक आहे. मृत्यूचे प्रमाण कमी झाले म्हणून आनंद मानून उपयोग नाही. अजूनही काही काळ खबरदारी घेणे गरजेचे आहे, तरच लॉकडाऊनची वेळ येणार नाही.आरोग्य यंत्रणा पुन्हा सज्जरूग्णांची संख्या दिवाळीनंतर वाढणार, हे लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा पुन्हा सतर्क झाली आहे. प्रत्येक तालुक्यात तपासणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावरही कोरोना चाचण्या घेण्यात येत आहेत.अन्यथा पुन्हा लॉकडाऊनलॉकडाऊनच्या काळाचे परिणाम सर्वांनाच माहित आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन झाले तर ते आपल्याला परवडणारे नाही. सध्या रूग्णसंख्या आटोक्यात आहे. मात्र, ती पुन्हा वाढली तर नाईलाजाने लॉकडाऊनची वेळ येईल.लोकांना वाटते कोरोना गेला, पण कोरोना गेलेला नाही. अजूनही अंदाजे एक वर्ष कोरोना राहील, कदाचित त्याहीपेक्षा अधिक काळ राहील. सद्यस्थितीत आपण काहीच सांगू शकत नाहीत. रूग्ण वाढले तर लॉकडाऊन करावेच वाढेल. म्हणूनच लोकांनी काळजी घ्यायला हवी. मास्क वापरायलाच हवा, शारीरिक अंतर राखायलाच हवं.- डॉ. संघमित्रा फुले,जिल्हा शल्य चिकित्सक

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकRatnagiriरत्नागिरीHealthआरोग्य