शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

वाशिष्ठी पुलावरून चाकरमान्याचा परतीचा प्रवास होणार सुखकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:35 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या चिपळूण बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी पुलाचे काम अंतिम ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या चिपळूण बहादूरशेख नाका येथील वाशिष्ठी पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. काॅंक्रीटीकरणाच्या शेवटच्या थराचे (वेरिंग कोट) काम अजून शिल्लक असून, त्याची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच जोडरस्त्याचेही काम शिल्लक आहे. हे काम सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाले तर पूल वाहतुकीच्या दृष्टीने चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी खुला होण्याची शक्यता आहे.

चिपळूणच्या वाशिष्ठी नदीवर बांधलेला ब्रिटिशकालीन पूल जीर्ण होऊन धोकादायक बनला आहे. जड वाहनांची वाहतूक झाल्याने हा पूल चक्क हलत होता. त्यामुळे अतिवृष्टीमध्ये पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत होता. तसेच नुकत्याच आलेल्या महापुराच्या वेळी पुलाचा काही भाग खचला आणि वाहतूक ठप्प पडली होती. अखेर मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत नवीन पुलाच्या कामाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मुळात मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम केंद्र सरकारने हाती घेतले, तेव्हा त्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणून सर्वप्रथम महामार्गावरील पुलांना मंजुरी देण्यात आली. त्यावेळी सर्वात प्रथम चिपळूण वाशिष्ठी पुलाचे काम सुरू करण्यात आले. चिपळूण परशुराम ते आरवली खेरशेत या ३३ किलोमीटर अंतरातील चौपदरीकरणाच्या टप्प्यात पुलाचा समावेश असल्याने पुलासाठी स्वतंत्र असा निधी दिलेला नाही.

या पुलाचे काम घेतलेल्या पहिल्या ठेकेदाराने काही अडचणीमुळे काम अर्धवट सोडले. त्यानंतर चौपदरीकरण करणाऱ्या चेतक इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडे पुलाचे काम वर्ग करण्यात आले. उर्वरित कामाला चेतक कंपनीने सुरुवात केली. परंतु, कोरोना लॉकडाऊन आणि कामगारांची कमतरता यामुळे चेतक कंपनी अडचणीत आली आणि महामार्गाच्या कामासह पुलाचे कामदेखील त्या कंपनीने सोडून दिले. साहजिकच वाशिष्ठी पुलाचे काम ठप्प पडले. त्यानंतर आलेल्या रिगल इन्फ्रा कंपनीने हे काम हाती घेतले आणि कामाला गती मिळाली. खासदार विनायक राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सतत पाठपुरावा करून पुलाचे काम सलग २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याला यशदेखील आले.

-------------------------

आता वाशिष्ठी पुलाचे मूळ काम पूर्ण झाले आहे. पुलावरील अंतिम टप्प्यातील काॅंक्रीटीकरण (वेरिंग कोट) चार दिवसांत देण्यात येणार आहे. तसेच जोडरस्त्याचे डांबरीकरण येत्या ८ दिवसात पूर्ण करून पूल एकेरी वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

- आर. आर. मराठे, शाखा अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, चिपळूण.

----------------------------

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास होणार सुखकर

कोकणातील गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणासाठी लाखो गणेशभक्त चाकरमानी कोकणात येतात. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी पुलाचे लोकार्पण करण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे काम पूर्णत्त्वास गेले तरी लोकार्पणासाठी कालावधी लागल्यास या पुलावरून चाकरमान्यांचे आगमन शक्य नाही. पण, परतीचा प्रवास सुखकर होण्याची शक्यता आहे.

--------------------

पुलाची एकूण लांबी २४७.५ मीटर

रुंदी २४ मीटर

१२ मीटर रुंदीचे दोन पूल

७ पिलर

पिलरची उंची १४.३०० मीटर