शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

समुद्र सुरक्षेच्या जागृतीसाठी दुचाकी रॅली

By admin | Updated: June 8, 2014 00:56 IST

समुद्र तट सुरक्षेच्या जनजागृतीसाठी भारतीय तटरक्षक दलाच्यावतीने रत्नागिरी येथील विमानतळावर मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

रत्नागिरी : समुद्र तट सुरक्षेच्या जनजागृतीसाठी भारतीय तटरक्षक दलाच्यावतीने रत्नागिरी येथील विमानतळावर मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मोटरसायकलसह भारतीय तटरक्षक दल, महाराष्ट्र सागरी सुरक्षा पोलीस, कस्टम विभाग आणि मत्स्य विभाग यांच्या एकूण १४ कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतलेल्या या रॅलीचे उदघाटन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी झेंडा दाखवून केले. रॅलीचे नेतृत्व भारतीय तटरक्षक दलाचे कमांडर एस. एम. सिंह यांनी केले. समुद्र तट सुरक्षा हा एक गंभीर व अतिमहत्त्वाचा राष्ट्रीय मुद्दा बनला आहे. रत्नागिरी व सिंंधुदुर्ग जिल्ह्यात तटीय भागातील कोळी आणि मासेमारी करणाऱ्या लोकांशी संवाद साधणे, त्यांना समुद्र तटाच्या संरक्षणाचे महत्व पटवून देणे आणि प्रभावी सागरी सुरक्षेचे जाळे निर्माण करण्याच्या दृष्टीने मच्छिमार बांधवाना सागरी संगठनांचे डोळे व कान बनविणे, हा मुख्य उद्देश असल्याचे कमांडर सिंंह यांनी सांगितले. तसेच यावेळी मच्छिमार बांधवांना समुद्र तटाच्या संरक्षणाबाबतचे व मासेमारी, पर्यावरणासंबंधी नियमांचे प्रचार व प्रसार साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच मासेमारी करताना मच्छिमारांना येणाऱ्या अडचणी समजावून घेण्यात आल्या. या उपक्रमाला रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. (प्रतिनिधी)