शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

सायकलची हवा काढली

By admin | Updated: August 31, 2015 21:14 IST

जिल्हाधिकारी : जिल्हा परिषदेची घनकचरा गोळा करण्याची योजना ‘कुंडी’त

रहिम दलाल --- रत्नागिरी जिल्ह्यातील ४ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ५६ ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा गोळा करण्यासाठी जिल्हा परिषदेने तीनचाकी सायकल खरेदीसाठी पाठवलेला प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून नाकारण्यात आला. जिल्ह्यातील एकाही नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात वा ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा प्रकल्प नसल्याने तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगर परिषद हद्दीमधील कचरा शहरातच टाकण्यात येतो. मात्र, त्याचे विघटन होत नसल्याने कचरा टाकण्यात येत असलेले परिसरातील रहिवासी प्रदूषणाने त्रस्त झाल्याचे चित्र सध्या सर्वच शहरांमध्ये दिसत आहे. जिल्ह्यात कितीही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली असली तरी घनकचऱ्याचा प्रश्न जैसे थे आहे. शहरात कचराकुंड्यांमध्ये कचरा टाकण्यात येत असला तरी तो दररोज उचलणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नसल्याने तो अस्ताव्यस्त पसरलेला असतो. तसेच रत्नागिरी शहरात घंटागाडीची सोय आहे. मात्र, सुटीच्या दिवशी कचरा विल्हेवाटीची सोय नसल्याने कचराकुंड्या भरलेल्या असतात.तसेच लोकसंख्या जास्त असलेल्या ग्रामपंचायतींच्या हद्दीतही कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था नसल्याने बहुतांश वेळा कचराकुंड्यांमध्येच कचरा जाळण्यात येतो. त्यामुळे ग्रामीण भागातील रहिवाशांनाही त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषदेकडून स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात ४ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ५६ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा गोळा करण्यासाठी तीन चाकी सायकल ग्रामपंचायतींना देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला होता. यामुळे मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींमध्ये स्वच्छतेचे सातत्य टिकून राहण्यास मदत होणार होती. म्हणून तीन चाकी सायकलसाठी प्रत्येकी २५ हजार ५०० रुपये खर्च करण्यात येणार होते. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ५६ ग्रामपंचायतींना अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी १४ लाख २८ हजार रुपये मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून हा प्रस्ताव नाकारण्यात आला. ग्रामपंचायतींना तीन चाकी सायकल देण्याचे जिल्हा परिषदेचे प्रयत्न केले होते. या ग्रामपंचायतींना आता अन्य कोणत्या योजनेतून तीन सायकल दिली जाणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (शहर वार्ताहर)रत्नागिरी शहरा लगतची शिरगांव ग्रामपंचायत जिल्ह्यातील श्रीमंत ग्रामपंचायतींपैकी मानली जाते. या ग्रामपंचायतीने घरोघरी जाऊन कचरा संकलीत करण्यासाठी घंटागाडीची सोय केली आहे. ही घंटागाडी ग्रामपंचायतीच्या प्रत्येक भागात जाऊन घनकचरा गोळा करते. घंटागाडीची सोय४ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या-तालुका ग्रामपंचायतीदापोली ६खेड ३चिपळूण ६गुहागर ८संगमेश्वर ५रत्नागिरी१९राजापूर ९एकूण ५६