शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

‘अंजनवेल’ची पाण्यावाचून तडफड

By admin | Updated: March 25, 2015 00:45 IST

‘रत्नागिरी गॅस’ने नाकारले : पंचायत समितीच्या आराखड्यातही समावेश नाही

गुहागर : अंजनवेल ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेच्या विहिरीमध्ये आठ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाकडून टँकरने होणारा पाणी पुरवठा नाकारण्यात आला आहे व पंचायत समितीच्या टंचाई कृती आराखड्यातही अंजनवेल ग्रामपंचायतीचे नाव नसल्याने पाणी पुरवठा होऊ शकत नसल्याने अंजनवेलवासियांना यावेळी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. या विरोधात हंडामोर्चा काढण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.
एन्रॉन प्रकल्प म्हणजेच दाभोळ वीज प्रकल्पापासून अंजनवेल गावातील विहिरी दूषित झाल्याने पाणी प्रश्नाला सामोरे जावे लागे. ब्राह्मणवाडी येथील ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेच्या एकमेव विहिरीचे पाणी चांगले असल्याने या विहिरीवरुन गावात पाणी पुरवठा केला जातो. एप्रिल व मे महिन्यामध्ये ही विहिरही आटत असून पाणीटंचाई स्थिती निर्माण होते. रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्प २००५ पासून सुरु झाल्यानंतर वारंवार ग्रामपंचायतीद्वारे मागणी केल्यानंतर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. गतवर्षी दहा टँकरने दररोज पाणी पुरवठा केला जात होता. गतवर्षी दहा टँकरने दररोज पाणी पुरवठा केला जात होता. यावेळी ग्रामपंचायतीकडून कंपनी प्रशासनाला टँकरने पाणी पुरवठ्यासंदर्भात पत्रव्यवहार केल्यानंतर दुर्लक्ष करण्यात आले.
याबाबत तहसीलदार वैशाली पाटील यांनी रत्नागिरी गॅस कंपनीचे अधिकारी अतुल देसाई, अंजनवेल ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजेश आंबरे, पंचायत समिती कक्ष अधिकारी दत्तात्रय आंबी यांच्या उपस्थितीत चर्चात्मक बैठक घेतली असता, यावेळी कंपनी प्रशासन पाणी पुरवठा करु शकत नसल्याचे स्पष्ट केले.
याबाबत कंपनी अधिकारी अतुल देसाई यांनी सांगितले की, कंपनीला वाशिष्ठी नदीतून शिरळ पंप हाऊसद्वारे चिपळूण ते गुहागर अशा पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा होतो. या पाईपलाईनला अनेक ठिकाणी अनधिकृतरित्या पाईप जोडून मोठ्या प्रमाणात पाणी चोरी होत असल्याने कंपनीला आवश्यक पाणी पुरवठा सध्या होत नाही. प्रकल्प बंद असला तरी प्रकल्पातील फायर सिस्टीमसाठी दररोजचा आवश्यक पाणी साठा ठेवावा लागतो. प्रकल्पासाठीच जर पाणी पुरत नसेल तर वेगळा पाणीपुरवठा आम्ही करूच शकत नाही, असे स्पष्ट करत प्रथम या कंपनी लाईनवर अनधिकृतपणे राजरोस होणाऱ्या पाणी चोरीवर कारवाई झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले.
याबाबत ग्रामविकास अधिकारी राजेश आंबरे यांनी सांगितले की, कंपनीला प्रकल्प पूर्ण कार्यान्वित असताना ६ टीएमसी पाणी आवश्यक आहे. सध्या प्रकल्प बंद असल्याने थोडेच पाणी प्रकल्पाला लागते. अंजनवेल ग्रामपंचायतीसाठी पाईपलाईनद्वारे दिलेला टॅप खोलून आवश्यक दररोजचा ३ लाख लिटर पाणी पुरवठा ग्रामपंचायतीला होऊ शकतो असे सुचित केले.
रत्नागिरी गॅस प्रकल्पाकडून दरवर्षी पाणीपुरवठा होत असल्याने पंचायत समितीच्या टंचाई कृती आराखड्यात अंजनवेल गावाचा समावेश नाही. तालुक्यातील ४२ वाड्या टंचाईकृती आराखड्यात आहेत. सध्या एक टँकर उपलब्ध असून, दुसऱ्या टँकरचा ताबा अद्याप मिळालेला नाही. यावर सध्या तरी कोणताच मार्ग नसल्याचे तहसीलदार वैशाली पाटील यांनी स्पष्ट केले. अंजनवेलच्या पाणीटंचाईचे संकट समोर असताना कंपनी प्रशासन व शासकीय यंत्रणेकडून कोणताच मार्ग काढला जात नसल्याने ग्रामस्थांनी हंडा मोर्चा काढण्याची तयारी सुरु केली आहे. (प्रतिनिधी)