शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या निर्बंधांमुळे आधीच बुडत्या एस. टी.चा पाय खोलात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST

रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे आधीच बुडत असलेल्या एस.टी.चा पाय आता ५० टक्केच भारमानाच्या निकषामुळे आणखीच खोलात गेला आहे. एका बाजूला ...

रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे आधीच बुडत असलेल्या एस.टी.चा पाय आता ५० टक्केच भारमानाच्या निकषामुळे आणखीच खोलात गेला आहे. एका बाजूला कर्मचाऱ्यांच्या वेतनासह नियमित सर्व खर्च होत असताना दुसऱ्या बाजूला उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटल्याने एस.टी.चा तोटा वाढतच चालला आहे.

शासनाने कोरोनामुळे सुरुवातीला वीकेंड लॉकडाऊन घोषित केले. त्यानंतर कडक निर्बंध जारी करण्यात आले होते. पुन्हा त्यामध्ये बदल करून पूर्ण लॉकडाऊनच घोषित केले आहे. अत्यावश्यक सेवेअंतर्गत एस.टी.ला लॉकडाऊनमधून वगळण्यात आले असले तरी लॉकडाऊनमुळे प्रवासीच नसल्याने एस.टी.ची अवस्था बिकट झाली आहे.

गतवर्षी लॉकडाऊनमुळे एस.टी.ला चांगलीच आर्थिक झळ सोसावी लागली होती. त्यानंतर एस.टी.च्या उत्पन्नाची गाडी हळूहळू रुळावर येत असताना पुन्हा लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे. भारमान शून्य असलेल्या मार्गावरील वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आली आहे. एस.टी.चे चालक वाहकांना हजेरीसाठी आगारात यावे लागत असले तरी पन्नास टक्के उपस्थितीनुसार ड्युटी लावण्यात येत आहे.

कोरोना संकटकाळात प्रवासी वाहतुकीसाठी चालक, वाहक तयार असतानाही प्रवाशांअभावी बहुतांश मार्गांवरील फेऱ्या बंद ठेवल्या जात आहेत. सध्या ७६ गाड्यांद्वारे ३५० फेऱ्या सुरू आहेत. २८ हजार किलोमीटर इतकाच प्रवास होत आहे. १० टक्क्यांपेक्षा कमी फेऱ्या सुरू असल्याने यावर्षीही आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

लॉकडाऊनपूर्व दैनंदिन एस.टी.च्या ६०० गाड्या धावत असल्याने ४ हजार २०० फेऱ्यांमुळे एक लाख ८० हजार किलोमीटर वाहतूक सुरू होती. प्रवासी संख्या दोन ते सव्वादोन लाखांच्या घरात असल्याने ४८ ते ५० लाखांपर्यंत उत्पन्न प्राप्त होत असे. मात्र, आता सध्या ७६ गाड्यांद्वारे ३५० फेऱ्या सुरू आहेत. त्यामुळे चार ते पाच लाखांचे उत्पन्न प्राप्त होत आहे.

..................

एकूण चालक - ९५५

वाहक - ७६९

चालक कम वाहक - १३६६

अन्य कर्मचारी - १४१०

चौकट

मंडणगड आगारातून ३, दापोली ३, खेड ७, चिपळूण १२, गुहागर ४, देवरूख ८, रत्नागिरी १६, शहरी ५, लांजा ४, राजापूर आगारातून १४ फेऱ्या दिवसाला सुटत आहे. ४४ आसनी क्षमता असली तरी केवळ २२ प्रवाशांच्या वाहतुकीसाठी परवानगी असून, त्याचे पालन करण्यात येत आहे.

..............

शासन निर्णयाचे पालन करण्यात येत असून, प्रवासी नसल्यामुळे दिवसाला जेमतेम ७६ गाड्यांद्वारे ३५० फेऱ्या सुटत आहेत. प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. फेऱ्या कमी असल्यामुळे चालक-वाहकांनाही नियमानुसार ड्युटी लावली जात आहे. वाहकांचा प्रवाशांशी थेट संपर्क येत असल्याने योग्य खबरदारीचे आवाहन केले आहे.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी.