शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

ऐन सणात एस. टी. बंद, प्रवाशांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:37 IST

लांजा : ऐन गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच लांजा आगाराने मंगळवारी दुपारनंतर ग्रामीण भागातील सर्वच एस. टी. फेऱ्या रद्द केल्याने ...

लांजा

: ऐन गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच लांजा आगाराने मंगळवारी दुपारनंतर ग्रामीण भागातील सर्वच एस. टी. फेऱ्या रद्द केल्याने सकाळी लांजा येथे आलेल्या प्रवाशांचा परतीचा प्रवासाचा मार्ग बंद झाला. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले.

सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम असल्याने गावी आलेले चाकरमानी व नागरिक गणपती बापाच्या दर्शनासाठी आपले नातेवाईक, मित्रमंडळींकडे जाण्यासाठी सकाळी घरातून बाहेर पडतात. दर्शन झाल्यावर जेवण आटोपून निवांत आपल्या घरी जातात. यासाठी सर्वच लोक एस. टी. चा वापर करतात. मंगळवारी गणपती विसर्जन असल्याने गणपती दर्शनासाठी, तसेच खरेदीसाठी लांजा येथे आलेल्या नागरिकांना एस. टी. बंद केल्याचा चांगलाच फटका बसला आहे.

मंगळवारी दुपारनंतर ग्रामीण भागातील एस. टी. सेवा पूर्णतः बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे अनेक बसस्थानकामध्ये बसलेल्या प्रवाशांना धक्काच बसला. घरच्या गणपतीचे विसर्जन असल्याने परतीची घाई असलेल्या या लोकांचा मार्गच बंद झाला. ग्रामीण भागातून आलेल्या असंख्य प्रवाशांना रिक्षा किंवा खासगी वाहनाशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे त्यांना नाहक आर्थिक तोटा सहन करावा लागला.

गणपती विसर्जन झाल्यानंतर चाकरमानी लोक लगेचच परतीच्या प्रवासाला जाणार आहेत. मंगळवारी रात्री लांजा आगारातून चार एस. टी. बसचे बुकिंग करण्यात आले आहे. मात्र, दुपारनंतर एस. टी. सेवा बंद झाल्याने त्यांच्यासमोरही लांजापर्यंत येण्याची मोठी समस्या निर्माण झाली. त्यांनाही खासगी सेवेचा आधार घेत लांजापर्यंत यावे लागले.

लांजा आगार स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच गणपती उत्सवाच्या कालावधीत दुपारनंतर एस. टी. सेवा बंद केल्याची घटना आहे. सध्या लांजा आगाराचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. मनाला वाटेल तेव्हा गाड्या सोडणे व मनाला वाटेल तेव्हा बंद करणे असे प्रकार केले जात आहेत. बसस्थानकात प्रवासी बसलेले असतानाही भारमन मिळत नसल्याचे कारण देत दुपारनंतर ग्रामीण भागातील एस. टी. फेऱ्या बंद, तसेच वस्तीच्या फेऱ्याही बंद करण्यात आल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता.