शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

वाहनचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:31 IST

साखरपा : संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या २५ वाहनचालकांवर साखरपा पोलीस ठाण्यातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली. या वाहनचालकांकडून सहा हजार ...

साखरपा : संचारबंदीच्या काळात विनाकारण फिरणाऱ्या २५ वाहनचालकांवर साखरपा पोलीस ठाण्यातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात आली. या वाहनचालकांकडून सहा हजार रुपये तसेच विनामास्क फिरणाऱ्यांकडून २००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या वाहनचालकांनी धसका घेतला आहे.

संचारबंदी कडक

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कोंड असुर्डे येथील ग्रामपंचायतीने कोरोनाच्या अनुषंगाने संचारबंदीच्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी साऱ्यांनीच लाॅकडाऊनचे नियम पाळण्याचा निर्णय गावाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

उकाड्याने केले हैराण

रत्नागिरी : सध्या तापमानाचा पारा वाढू लागला आहे. उन्हाच्या कडाक्याबरोबरच घामाच्या धारांनी नागरिकांना असह्य केले आहे. घशाला कोरड कायम पडलेली आहे. एप्रिल महिन्यातील उष्म्या त्रासदायक होत असून, सध्या कोरोनामुळे शीतपेये पितानाही नागरिकांना भीती वाटत आहे.

फिरत्या विक्रेत्यांचे नुकसान

रत्नागिरी : सध्या लाॅकडाऊनमुळे सर्वच दुकाने बंद आहेत. रस्त्यावरील फेरीवाले, फळ तसेच रसविक्रेते यांनाही आता रस्त्यावर विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या या विक्रेत्यांचा व्यवसायच ठप्प झाला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

सेतू कार्यालय बंद

देवरूख : कोरोनाच्या कारणामुळे येथील सेतू कार्यालय बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, सेतू बंद राहिल्याने त्याचा फटका महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थ्यांना बसला आहे. सध्या या विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज भासत आहे; मात्र सेतू कार्यालय बंद राहिल्याने हे दाखले मिळविताना अडचणी येत आहेत.

कार्यालयांमध्ये भीतीचे वातावरण

चिपळूण : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. त्यामुळे आता विविध कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी कोरोनाबाधित होऊ लागले आहेत. शासनाने ५० टक्के उपस्थितीचा आदेश काढला असला, तरी काही कार्यालयांमध्ये अजूनही १०० टक्के कर्मचारी येत आहेत. त्यामुळ संसर्गाची भीती कायम आहे.

विजेचा खेळ कायम

लांजा : उकाड्याने त्रस्त होत असतानाच रात्री-अपरात्री विजेचा पुरवठा अनियमित झाला आहे. उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागले असतानाच रात्री बऱ्याचदा वीज जात असल्याने पंख्याशिवाय काही काळ रहावे लागत आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.

कनेक्टिव्हीटीची समस्या कायम

राजापूर : शहर तसेच ग्रामीण भागात इंटरनेटच्या कनेक्टिव्हीटीची समस्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. सध्या सर्वच कामे ऑनलाईन सुरू आहेत, मात्र कनेक्टिव्हीटीमध्ये सतत येणाऱ्या व्यत्ययांमुळे अनेक अडचणी येत आहेत. मुलांच्या ऑनलाईन अभ्यासावरही त्याचा परिणाम होत आहे.

उद्यानांमध्ये शुकशुकाट

रत्नागिरी : सध्या कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू झाले आहे. त्यामुळे शासनाने सार्वजनिक ठिकाणांवरही बंदी आणली आहे. त्यामुळे आता उद्याने बंद आहेत. बालके सध्या घरात बसून कंटाळली असली, तरी त्यांना उद्यानात जाता येत नाही. मुलांअभावी या उद्यानात सध्या शुकशुकाट पसरला आहे.

पाण्याची टंचाई

मंडणगड : तालुक्यातील अनेक दुर्गम भागातील जनतेला सध्या पिण्याच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर दुर्भिक्ष्य जाणवत आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून या भागांना पाण्याची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे काही भागांमध्ये आता टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात येत आहे.