शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
3
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
4
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
5
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
6
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
7
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
9
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
10
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
11
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
12
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
13
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
14
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
15
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

Ratnagiri: साखरपुड्याच्या दिवशी घरातून निघून गेला; लग्नाच्या दिवशी मृतदेह दरीत सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:35 IST

अणुस्कुरा घाटात कार चारशे फूट दरीत कोसळली, अपघाती मृत्यूचे गूढ

राजापूर : साखरपुड्याच्या दिवशीच घरातून निघून गेलेल्या लांजा येथील तरुणाच्या गाडीचा अणुस्कुरा घाटात अपघात झाला असून, त्यात तो तरुण जागीच ठार झाला आहे. त्याची कार घाटातून ४०० फूट खोल दरीत कोसळली आहे. कौस्तुभ विजय कुरूप (३०, लांजा), असे त्याचे नाव आहे. ३ जूनला त्याचा साखरपुडा होणार होता आणि बुधवार, ४ जून रोजी वैदिक परंपरेनुसार त्याचे लग्न होणार होते. मात्र, त्याआधीच त्याचा अपघातीमृत्यू झाल्याने गूढ निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे घाटमार्गे प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला रस्त्यावर गाडीचे इंजिन पडलेले दिसले. ती माहिती त्याने अणुस्कुरा तपासणी नाक्यावरील पोलिसांना दिली. त्याआधारे तपासणी नाक्यावरील पोलिसांनी घाटात जाऊन पाहणी केली असता एक गाडी दरीत कोसळली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तातडीने ही माहिती राजापूर पोलिसांना देण्यात आली. राजापूरचे पोलिस निरीक्षक अमित यादव, लांजाचे पोलिस निरीक्षक नीलकंठ बगळे आपल्या कर्मचाऱ्यांसह अणुस्कुरा घाटात दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थही अपघाताचे वृत्त समजताच धावून आले.अपघातग्रस्त गाडीची पुरती चाळण झाली होती आणि त्याच्या बाजूलाच एक तरुण पडला होता. त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अधिक माहितीमध्ये तो लांजातील कौस्तुभ कुरूप असल्याचे पुढे आले. तो कामानिमित्त कोल्हापूरला गेला होता. मंगळवारी ३ जूनला तो लांजाकडे परत येत असताना अणुस्कुरा घाटात हा अपघात झाला असावा आणि घाटातील धुक्यामुळे हा अपघात कोणाच्याही लक्षात आला नसावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

कौस्तुभ बेपत्ता झाल्याची पत्नीची तक्रारदरम्यान, कौस्तुभ बेपत्ता असल्याची तक्रार त्याची पत्नी प्राजक्ता यांनी मंगळवारी संध्याकाळी लांजा पोलिस स्थानकात नोंदवली आहे.

नोंदणीविवाहानंतर होणार होते विधीपरंपरेनुसार लग्नकौस्तुभ आणि प्राजक्ता यांचे ५ मे २०२५ रोजी रजिस्टर लग्न झाले आहे. मात्र, कौस्तुभच्या घरच्यांना ते मान्य नव्हते. यामुळे विधीपरंपरेनुसार मंगळवार, ३ रोजी ते दोघे साखरपुडा करणार होते आणि बुधवार ४ रोजी विवाह करणार होते.

मध्यरात्रीनंतर कोणालाही न सांगता बाहेर पडलामात्र, सोमवारी मध्यरात्रीनंतर कौस्तुभ घरात कोणालाही न सांगता कार घेऊन बाहेर निघून गेला. मंगळवारी साखरपुडा असल्याने प्राजक्ता त्यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, संपर्क न झाल्यामुळे अखेर मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता लांजा पोलिस स्थानकात कौस्तुभ बेपत्ता झाल्याची तक्रार लांजा पोलिसांकडे नोंदवली आहे.

अनेक प्रश्न अनुत्तरितसाखरपुड्याच्या दिवशी कौस्तुभ कोणालाही न सांगता घराबाहेर निघून का गेला, अपघात नेमका कधी झाला, अपघातग्रस्त गाडीचे इंजिन रस्त्यावरच कसे पडले होते, यासारखे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. अपघात कसा आणि कधी झाला, याबाबतही गूढ असून, पोलिस तपासात या गोष्टी उघड होण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAccidentअपघातDeathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस