शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
2
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
3
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
4
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
5
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
8
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
9
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
10
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
11
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
12
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
13
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
14
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
15
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
16
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
17
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
18
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Shyam Nath Goswami : Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी
Daily Top 2Weekly Top 5

बहादूरशेख झोपडपट्टी हटविण्यासाठी ३१ मेची डेडलाईन

By admin | Updated: May 20, 2015 00:14 IST

चिपळूण पालिका : पोलीस फौजफाट्यासह मुख्याधिकारीही घटनास्थळी, वातावरणात तणाव--लोकमतचा दणका

चिपळूण : शहरातील बहादूरशेख नाका, राधाकृष्णनगर परिसरात नगर परिषदेच्या जागेवर बांधण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्या हटविण्यासाठी मुख्याधिकारी प्रकाश पाटील, पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर, सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्यासह पोलीस फौज फाटा व कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते. रहिवाशांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी विनंती केल्याने मुख्याधिकाऱ्यांनी ३१ मेपर्यंत डेडलाईन दिली असून या दिवसापर्यंत झोपड्या स्वत:हून काढण्याची तयारी दर्शवली आहे. बहादूरशेख नाका परिसरात नगर परिषदेच्या एमआयडीसी जागेवर अतिक्रमण करुन परजिल्ह्यातील कामगारांनी झोपड्या उभारल्या आहेत. नगर परिषदेने यापूर्वी या झोपड्या हटविल्या होत्या. नव्याने झोपड्या उभारल्यानंतर त्या हटविण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांनी दोन वेळा नोटीस बजावली. स्वत: काही रहिवाशांना घटनास्थळी भेट देवून झोपड्या हटविण्यास सांगण्यात आले. परंतु, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मंगळवारी मुख्याधिकारी प्रकाश पाटील पोलीस बंदोबस्त घेवून झोपड्यांवर कारवाई करण्यासाठी घटनास्थळी कर्मचाऱ्यांसह आले होते. यावेळी बहुजन समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, नगरसेवक राजेश देवळेकर यांनी पावसाळा जवळ असल्याने चार महिने मुदतवाढ द्या, अशी विनंती केली. मात्र मुख्याधिकारी मुदतवाढ देण्यास तयार नव्हते. शहरातील अनधिकृत बांधकामे आपल्याला दिसत नाहीत. आपण बिल्डरना पाठिशी घालता आणि गरिबांचे संसार उध्वस्त करता हे योग्य नाही, असे सातत्याने जाधव व देवळेकर सांगत होते. परंतु, हे नेहमीचेच झाले आहे. कारवाईच्या वेळेला कोणीतरी राजकीय पुढारी हस्तक्षेप करतात आणि कारवाई थांबविली जाते आता हे चालणार नाही, अशी भूमिका मुख्याधिकाऱ्यांनी घेतली. यावेळी १५० ते २०० कर्मचारी, नागरिक व पोलीस रस्त्यावर उभे होते. सातत्याने विनवणी केल्यानंतर मध्येच मुख्याधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. कर्मचारी झोपड्या उठविण्यासाठी कामाला लागले. यावेळी पुन्हा जाधव यांनी आम्ही चर्चा करतोय आणि तुम्ही कारवाई करताय हे अयोग्य आहे, असे सांगितले. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी तुमच्यावरही कारवाई केली जाईल. तेव्हा आम्हांला आमचे काम करु द्या असे सांगितले. मुख्याधिकाऱ्यांनी रहिवाशी व पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देवून ३१ मेपर्यंत मुदत देण्याचे कबूल केले. (प्रतिनिधी)नगरसेवक राजेश देवळेकर कारवाईच्यावेळी जेवढे आक्रमक नसतात त्याहीपेक्षा जास्त आक्रमक ते यावेळी दिसले. रहिवाशांना चार महिने मुदतवाढ मिळावी यासाठी त्यांचा आटापिटा सुरु होता. ही त्यांची वैयक्तिक भूमिका होती की शिवसेनेची भूमिका होती असा प्रश्न उपस्थितांमध्ये चर्चिला जात होता. गरीबांचा आपल्याला कळवळा आहे हे दाखविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असावा असेही बोलले जात होते.नगर परिषदेच्या ज्या जागेवर ही झोपडपट्टी उभारली आहे. या झोपडपट्टीतील रहिवाशांना रेशनकार्ड व मतदान ओळखपत्र देण्यात आले आहे. कायमचा पत्ता नसताना अनधिकृत असलेल्या झोपड्यातील रहिवाशांना रेशनकार्ड तहसीलदारांनी दिले कसे? आणि कोणाच्या आशीर्वादाने? याची चौकशी व्हावी आणि असे असतानाही त्यांच्यावर कारवाई का केली जाते, असा सवाल सुभाष जाधव यांनी व्यक्त केला आहे.नगर परिषदेच्या ज्या जागेवर ही झोपडपट्टी उभारली आहे. या झोपडपट्टीतील रहिवाशांना रेशनकार्ड व मतदान ओळखपत्र देण्यात आले आहे. कायमचा पत्ता नसताना अनधिकृत असलेल्या झोपड्यातील रहिवाशांना रेशनकार्ड तहसीलदारांनी दिले कसे? आणि कोणाच्या आशीर्वादाने? याची चौकशी व्हावी आणि असे असतानाही त्यांच्यावर कारवाई का केली जाते, असा सवाल सुभाष जाधव यांनी व्यक्त केला आहे.