शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

रत्नागिरी जिल्ह्यातील २०८ शाळांची होणार दुरुस्ती, नियोजन समितीतून निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 19:19 IST

विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतण्याचा धोका

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील २७५ प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या असून, शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतण्याचा धोका निर्माण झाला आहे.  धाेकादायक बनलेल्या शाळांच्या इमारतींपैकी २०८ शाळांच्या दुरुस्तीला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ३ कोटी ६० लाख २३ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये गरीब तसेच सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेतात. शाळांची गुणवत्ता सुधारावी, यासाठी शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचा चांगला परिणामही अलीकडच्या काळात दिसत आहे. मात्र, ज्या शाळेत ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेत आहेत, त्या जिल्हा परिषदेच्या सुमारे २७५ शाळा धोकादायक बनल्या आहेत. त्या शाळांच्या इमारती नादुरुस्त झाल्या आहेत.या शाळांमधून शिक्षण घेणे विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणारे आहे. त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठविण्यास शिक्षकही तयार हाेत नव्हते. या शाळांच्या दुरुस्तीची सातत्याने मागणी हाेत हाेती. या शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्याने त्या लवकरच दुरुस्त करण्यात येणार आहे.

पालकमंत्र्यांचे विशेष लक्षजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शासनाकडे प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी निधीची मागणी करण्यात आलेली आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घालून जिल्हा नियोजनमधून सन २०२४-२५ या वर्षात शाळा दुरुस्तीसाठी ३ कोटी ६० लाख २३ हजार रुपये मंजूर केले आहेत.

आणखी ६७ शाळांची दुरुस्ती आवश्यक

नादुरुस्त शाळांच्या  धोकादायक इमारतींमध्ये बसून मुले शिक्षण घेत आहेत, तर काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी शाळा भरवण्यात येत आहेत.धोकादायक ठरणाऱ्या २०८ शाळांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित ६७ शाळांचीही दुरुस्ती हाेणे गरजेचे आहे.

दुरुस्तीसाठी मंजुरी मिळालेल्या शाळातालुका - नादुरुस्त शाळामंडणगड - ०४दापोली - २२खेड - ६३चिपळूण- २५गुहागर - १२संगमेश्वर - २८रत्नागिरी - २२लांजा - ०९राजापूर - २३एकूण - २०८

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळाPlanning Commissionनियोजन आयोगfundsनिधी