शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

रत्नागिरी जिल्ह्यातील २०८ शाळांची होणार दुरुस्ती, नियोजन समितीतून निधी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 19:19 IST

विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतण्याचा धोका

रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील २७५ प्राथमिक शाळांच्या इमारती धोकादायक बनल्या असून, शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतण्याचा धोका निर्माण झाला आहे.  धाेकादायक बनलेल्या शाळांच्या इमारतींपैकी २०८ शाळांच्या दुरुस्तीला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ३ कोटी ६० लाख २३ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांमध्ये गरीब तसेच सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेतात. शाळांची गुणवत्ता सुधारावी, यासाठी शिक्षण विभागातर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याचा चांगला परिणामही अलीकडच्या काळात दिसत आहे. मात्र, ज्या शाळेत ग्रामीण भागातील मुले शिक्षण घेत आहेत, त्या जिल्हा परिषदेच्या सुमारे २७५ शाळा धोकादायक बनल्या आहेत. त्या शाळांच्या इमारती नादुरुस्त झाल्या आहेत.या शाळांमधून शिक्षण घेणे विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतणारे आहे. त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठविण्यास शिक्षकही तयार हाेत नव्हते. या शाळांच्या दुरुस्तीची सातत्याने मागणी हाेत हाेती. या शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाल्याने त्या लवकरच दुरुस्त करण्यात येणार आहे.

पालकमंत्र्यांचे विशेष लक्षजिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून शासनाकडे प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीसाठी वेळोवेळी निधीची मागणी करण्यात आलेली आहे. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष घालून जिल्हा नियोजनमधून सन २०२४-२५ या वर्षात शाळा दुरुस्तीसाठी ३ कोटी ६० लाख २३ हजार रुपये मंजूर केले आहेत.

आणखी ६७ शाळांची दुरुस्ती आवश्यक

नादुरुस्त शाळांच्या  धोकादायक इमारतींमध्ये बसून मुले शिक्षण घेत आहेत, तर काही ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी शाळा भरवण्यात येत आहेत.धोकादायक ठरणाऱ्या २०८ शाळांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी निधीही मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित ६७ शाळांचीही दुरुस्ती हाेणे गरजेचे आहे.

दुरुस्तीसाठी मंजुरी मिळालेल्या शाळातालुका - नादुरुस्त शाळामंडणगड - ०४दापोली - २२खेड - ६३चिपळूण- २५गुहागर - १२संगमेश्वर - २८रत्नागिरी - २२लांजा - ०९राजापूर - २३एकूण - २०८

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळाPlanning Commissionनियोजन आयोगfundsनिधी