शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

शोधू कुठं; परदेशातून आलेले १०६ जण सापडेनात, रत्नागिरी आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2021 15:45 IST

जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत परदेशातून ७४ नागरिक आले होते. मात्र, शनिवारी त्यामध्ये आणखी ८३ नागरिकांची भर पडली आहे. त्यामुळे परदेशातून आलेल्या नागरिकांची एकूण संख्या १५७ झाली आहे.

रत्नागिरी : ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग वाढत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात परदेशातून १५७ जण दाखल झाले आहेत. त्यापैकी ५१ जणांची कोरोना चाचणी झाली असून, त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आहे. मात्र, १०६ जणांचा अजूनही आराेग्य विभागाला शाेध लागलेला नाही. या सर्वांचा शाेध घेण्याचे काम सुरु असून, त्यांचा शाेध लागत नसल्याने आराेग्य यंत्रणेसमाेर आव्हान उभे राहिले आहे.

काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला हाेता. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यात येत हाेती. तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असतानाच ओमायक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट जीवघेणा असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हा प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्यात येत असून, परदेशातून येणाऱ्या लोकांसाठी कठोर नियम पाळण्यात येत आहेत.

जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत परदेशातून ७४ नागरिक आले होते. मात्र, शनिवारी त्यामध्ये आणखी ८३ नागरिकांची भर पडली आहे. त्यामुळे परदेशातून आलेल्या नागरिकांची एकूण संख्या १५७ झाली आहे.

परदेशातून जिल्ह्यात दाखल झालेले नागरिक विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांची तत्काळ शासनाकडे नोंद करण्यात येत आहे. त्यानंतर त्या लोकांची माहिती जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला कळविण्यात येत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दाखल झालेल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य यंत्रणा धडपडत आहे. ज्या गावामध्ये परदेशातून नागरिक आले आहेत. त्या गावाच्या जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांना कळविण्यात येत आहे. तेथून परदेशातून आलेल्या नागरिकांशी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत संपर्क साधण्यात येत आहे. आतापर्यंत परदेशातून आलेल्या ५१ लोकांशी संपर्क साधण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. त्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली आहे. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

मात्र, जिल्ह्यात दाखल झालेल्या १०६ जणांचा अद्यापही शाेध लागलेला नाही. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांचा शाेध घेण्याचे आव्हान आता आराेग्य यंत्रणेसमाेर आहे. याबाबत त्या-त्या तालुक्यातील आराेग्य यंत्रणांना माहिती देण्यात आली आहे. यातील काही नागरिकांचे माेबाईल नंबर बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क साधणे मुश्किल झाले आहे. त्यांचा शाेध घेऊन त्यांचे तत्काळ विलगीकरण करण्यात येणार आहे.

तालुकानिहाय आकडेवारी

मंडणगड ०८

दापोली २६

खेड २९

चिपळूण ३५

गुहागर ०२

संमेश्वर १०

रत्नागिरी ३४

लांजा ०१

राजापूर ०३

परदेशातून आलेले नागरिक

दुबई - २०

कतार- ०८

कुवेत- ०५

ओमान ०४

बहारीन ०३

अमेरिका ०३

सऊदी अरेबिया ०२

आबूधाबी ०१

शारजा ०१

साऊथ आफ्रिका ०१

युके ०१

चेन्नई ०१

सिंगापूर ०१

एकूण ५१

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्या