शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत सलग दुसऱ्या दिवशी १० रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:28 IST

रत्नागिरी : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, २४ तासांत ५५५ रुग्ण आढळल्याने एकूण १५,६३० रुग्ण झाले आहेत; तर सलग दुसऱ्या ...

रत्नागिरी : कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, २४ तासांत ५५५ रुग्ण आढळल्याने एकूण १५,६३० रुग्ण झाले आहेत; तर सलग दुसऱ्या दिवशी १० जणांचा काेराेनाने मृत्यू झाला. मृतांची एकूण संख्या ४४९ झाली आहे. २५५ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ११,९१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

प्रशासनाकडून कडक निर्बंध घालण्यात आलेले असतानाही कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत चालला आहे. आतापर्यंतच कोरोनाबाधितांची आजची ५५५ ही संख्या उच्चांकी ठरली आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये आरटीपीसीआर चाचणीतील ३४८ रुग्ण तर ॲन्टिजेन चाचणीतील २०७ रुग्ण आहेत. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात १६० रुग्ण, चिपळुणात १३१, दापोलीमध्ये २६, खेडमध्ये ७२, गुहागरात ५२, संगमेश्वरमध्ये ६१, मंडणगडात ९, लांजात २४, राजापुरात २० रुग्ण आढळले. पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचा दर १२.५ टक्के, तर बरे होण्याचा दर ७६.१९ टक्के आहे.

कोरोना मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असून १० रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील ३, चिपळूण दापोलीतील प्रत्येकी २ आणि रत्नागिरी, राजापूर, खेड येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये ४ महिला आणि ६ पुरुष रुग्ण आहेत. मृत्यूचे प्रमाण २.८७ टक्के आहे. गृहविलगीकरणात ११२४ रुग्ण असून वेगवेगळ्या कोविड रुग्णालयांमध्ये २१४५ रुग्ण उपचार घेत आहेत.