शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

सुधागडातील गावे नॉट रिचेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 02:12 IST

आपण डिजिटल इंडियाचा पुरस्कार केला आहे. मात्र, सुधागड तालुक्यात याला हरताळ फासलेले दिसते.

विनोद भोईरपाली : आपण डिजिटल इंडियाचा पुरस्कार केला आहे. मात्र, सुधागड तालुक्यात याला हरताळ फासलेले दिसते. परिणामी, एकमेकांना संपर्काबरोबरच सरकारी, शैक्षणिक व इतर कामांचीही गैरसोय होत असल्याने येथील नागरिक संतप्त आहेत. त्यांच्याकडून महत्त्वाच्या ठिकाणी टॉवर लावण्याची मागणी केली जात आहे. तालुक्यात १०९ गावे आहेत. त्याबरोबरच हा अदिवासीबहुल तालुका आहे. बहुसंख्य गावे डोंगर व दऱ्यांखाली वसली आहेत. यातील जवळपास ४० टक्के गावांत मोबाइल व इंटरनेट सेवा अजूनही मिळालेली नाही. तर काही गावांमध्ये फक्त ठरावीक कंपन्यांचीच मोबाइल व इंटरनेट सेवा चालते तीही अगदी व्यत्यय देत.कानाकोपºयात व डोंगर जंगलात नेटवर्क असल्याचे मोठमोठे दावे करणाºया कंपन्यांचे दावे सुधागड तालुक्यात सपशेल फेल ठरत आहेत. तालुक्याचे मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या पाली शहरातही मोबाइल व इंटरनेटसेवेचा बोजवारा उडाला आहे. सर्वच कंपन्यांचीच मोबाईल व इंटरनेटसेवा व्यवस्थित चालत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, तर अनेक कामांचा खोळंबा होत आहे. त्यामुळे बँक व सरकारी व्यवहारांवर परिणाम होतो. महसूल कार्यालयातील विविध दाखले, सात-बारा उतारे, बँकेतील आॅनलाइन व्यवहार तसेच शैक्षणिक माहिती भरणे यासह इतर अनेक व्यवहार करण्यासाठी मोबाइल व इंटरनेट नेटवर्कची आवश्यकता लागते. परिणामी, नेटवर्क अभावी ही कामे अपूर्ण राहतात किंवा वेळीच पूर्ण होत नाहीत, यामुळे नागरिकांना तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना हकनाक खोळंबावे लागते.गावागावांतील तलाठी सजा कार्यालयातील तलाठ्यांना नेटवर्क नसल्याने आॅनलाइनकामे पूर्ण करण्यासाठी पालीत यावे लागते. तेथेही नेटवर्कचा प्रश्न आहे, त्यामुळे त्यांचा वेळ व श्रम वाया जातो. तसेच सर्वसामान्य नागरिकांची कामेदेखील खोळंबतात.कोणी दगावल्यास किंवा आजारी पडल्यास डॉक्टर किंवा नातेवाइकांना साधा फोन करायचा झाल्यास नेटवर्क नसल्यामुळे खूपच त्रास होतो. मग रात्री-अपरात्री नेटवर्क शोधत फिरावे लागते. अशी अवस्था येथील नागरिकांची आहे. त्यामुळे तालुक्यातील नेटवर्क सेवा सुरळीत करावी, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.>निवडणूक काळात वायरलेसचा आधारनेटवर्क समस्येमुळे निवडणूक काळात तब्बल ३२ गावांमध्ये प्रशासनाने चक्क वायरलेस सेवेचा वापर केला. कारण त्याशिवाय निवडणुकीतील कोणतीच माहिती किंवा आकडेवारी मिळणे शक्य नव्हते आणि विशेष म्हणजे, प्रत्येक केंद्रावर संपर्क साधणे अवघड झाले असते.>तालुक्यात नेटवर्क ची समस्या असल्याने सरकारी कामांत खूप व्यत्यय येतो. याबरोबरच केवळ नेटवर्कच्या अडचणींमुळे लोकांची विविध कामे विनाकारण खोळंबतात. सामान्य नागरिकांना खूप त्रास होतो. आपत्ती व्यवस्थापन करताना किंवा इतर कारणांसाठी लोकांसोबत संपर्क साधनेही शक्य होत नाही. त्यामुळे या नेटवर्क सेवा देणाºया कंपन्यांनी याची दखल घेऊन ताबडतोब ही समस्या मार्गी लावावी.- दिलीप रायन्नावार, तहसीलदार, पाली-सुधागड