शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

वाघ दिसल्याने दांडगुरी परिसरात दहशत, वनविभाग तात्काळ घटनास्थळी; ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2021 15:44 IST

Raigad Local News : वाघाच्या नावाने अनेकांचा थरकाप उडतो. श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथे गुरुवारी रात्रीच्यावेळी परिसरात असलेल्या झुडपांमध्ये  वाघाचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

- गणेश प्रभाळेदिघी - वाघाच्या नावाने अनेकांचा थरकाप उडतो. श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथे गुरुवारी रात्रीच्यावेळी परिसरात असलेल्या झुडपांमध्ये  वाघाचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. रात्री च वनविभागाने दखल घेत भेट दिली व वाघ सदृश प्राणी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता सदर वाघाने आपला मोर्चा रहिवासी परिसरात वळविल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी परिसर म्हणजे जंगल क्षेत्राला जोडून असणारे गाव, तसे थंड वातावरण असलेले परिसर म्हणून याठिकाणाला ऐतिहासिक प्रसिद्धी आहे. विशेष म्हणजे सदर वाघ दिसल्यापासून सर्वांना खबर लागल्याने परिसरात आणखीच दहशत निर्माण झाली असून कोणत्याही परिस्थितीत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दांडगुरी, वाकलघर, आसुफ तसेच बोर्ला भागात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल आहे. याभागात नदी देखील वाहत आहे.  त्यामुळे या परिसरात वाघासह इतर प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याचे समजते आहे.  

कोरोनाच्या दहशतीमध्ये सर्व लोक असतांना आता लोकांना वाघोबाचे दर्शन होत असल्याने सर्व नागरिक घाबरलेल्या स्थितीत आहेत. रात्री 10.00 वाजेच्या सुमारास दांडगुरी परिसरात देखील वाघाचे दर्शन झाले. या घटनेची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांना देण्यात आली. यामध्ये बोर्ली राउंड पथकाचे बुरान शेख, प्रतीक गजेवार, एल. एम. गिराने यांनी घटनास्थळी भेट दिली. व संशयित प्राण्याचे ठसे घेऊन वनविभागाकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. 

सद्या वाघ जंगल सोडून मानववस्तीत आल्याने नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या दहशतीमुळे जंगल परिसरातील लोकांचे जगणे मुश्किल होऊन बसले आहे, शेतीची हंगामी कामे करणे, किंवा मिळेल ते काम करून आपला प्रपंच चालविणे, ही या लोकांची कामे संपूर्णपणे लॉक डाउन व वाघाच्या भीतीमुळे खोळंबली जाणार आहेत.  मात्र वनविभागाकडून जोपर्यंत वाघाचा बंदोबस्त लावला जात नाही, तोपर्यंत गावकऱ्यांमधील भीतीचे वातावरण दूर होणार नाही, हेही तितखेच खरे आहे.

आम्ही घटनास्थळी गेलो असता संशयित प्राण्याचे ठसे उमटले होते. तपासासाठी पुढे पाठवले आहेत. नागरिकांनी जागरूक राहावे. गुरांना आपल्या गोठ्यात बांधून ठेवावे. याघटनेमुळे वनविभाग सतर्क राहील.- मिलिंद राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी, श्रीवर्धन

गुरुवारी रात्रीच्या वेळी बाइकस्वाराने वाघ दिल्याचे सांगितले आम्ही तात्काळ तिकडे गेलो असता वाघ पळून गेल्याचे निदर्शनास आले मात्र काळोख असल्याने पुढे गेलो नाही. तात्काळ वनविभागाला कळविले व अधिकाऱ्यांनी देखील भेट दिली.-   ग्रामस्थ, दांडगुरी.

टॅग्स :TigerवाघRaigadरायगड