शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

कौतुकास्पद! प्राण्यांची वणवण थांबणार, जंगलातच पाणी मिळणार! वन विभागाचा पुढाकार

By निखिल म्हात्रे | Published: March 29, 2024 11:28 AM

पाणवठे स्वच्छ करून केली सुविधा

निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : पाणीटंचाईत केवळ माणसेच होरपळतात असे नाही, तर पक्षी-प्राण्यांनाही त्याचा फटका बसतो. पाण्याच्या शोधात जंगली प्राणी मानवी वस्तीत येतात आणि कोणाची तरी शिकार बनतात. त्यामुळे प्राण्यांना जंगलातच मुबलक पाणी मिळावे, यासाठी वन विभागाने पुढाकार घेत जंगलातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत शोधले आहेत. हे स्रोत स्वच्छ करून जंगली प्राण्यांसाठी पाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने त्यांची पाण्याची चिंता मिटली आहे.

वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे जंगलातील पशू, पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. हे लक्षात घेत त्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी पुढाकार घेतला. जंगल भागातील पाणवठे स्वच्छ करून पशुपक्ष्यांसाठी पाण्याचा स्रोत खुला करण्याचे आदेश वनक्षेत्रपाल यांना दिले. जिल्ह्यात तातडीने त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली. अलिबागसह सुधागड व अन्य तालुक्यांमध्ये वन कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने पाण्याचे स्रोत शोधले. ते स्वच्छ करून जंगलातील प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली.

  • प्राणीप्रेमींचाही उपक्रमाला पाठिंबा

उपवनसंरक्षक राहुल पाटील यांच्या संकल्पनेचे जिल्ह्यात सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून प्राणीप्रेमींनीही या उपक्रमाला पाठिंबा देत पाण्याचे स्रोत स्वच्छ करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील जंगल भागातील पशुपक्ष्यांच्या पाण्याचा प्रश्न आता मिटल्यात जमा आहे.

जंगली प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जंगलातील पिण्याचे पाण्याचे स्रोत शोधून ते स्वच्छ करण्यात आले आहेत. यातून प्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी कर्मचाऱ्यांसह स्थानिकांनीही चांगले सहकार्य केले आहे.- राहुल पाटील, उपवनसंरक्षक, अलिबाग.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभागalibaugअलिबागWaterपाणीwildlifeवन्यजीव