शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 8:09 AM

Loksabha Election - राज ठाकरे यांच्या मनसेनं भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला, त्यावरून आदित्य ठाकरेंनी मनसेला खडे बोल सुनावले असून भाजपावरही निशाणा साधला आहे.

मुंबई - Aaditya Thackeray on MNS ( Marathi News ) देरासरबाहेर मांसाहार टांगून मनसेच्या लोकांनी आंदोलन केले होते, तीच मनसे आज भाजपासोबत आहे त्यामुळे जैनसमाज भाजपासोबत राहणार का?, ज्या मनसेनं उत्तर भारतीयांना मारहाण केली त्या मनसेचा पाठिंबा भाजपाला चालतो का असा सवाल करत उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मनसे-भाजपावर हल्लाबोल केला आहे.

आदित्य ठाकरेंनी एका मुलाखतीत म्हटलं की, मी मनसेच्या नेत्यांवर कधी बोलत नाही. ते पथ्य मी पाळतो. पण मी मनसेच्या कार्यकर्त्यांना विचारतो, तुम्ही जो भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिलाय आणि त्यांच्या शिंदे गटाला दिलाय, त्याच्यात गुजराती सोसायटीबाबत जी घटना घडली, गुजरात आणि गुजराती लोकांसोबत आमचे भांडण नाही. पण इथून उद्योग उचलून तिकडे नेले जातात तेव्हा मी नडणार नाहीतर ते सर्व आमचेच आहेत. मराठी माणसाला नोकरी नाकारली, सगळे उद्योग धंदे जे गुजरातला चाललेत त्याला बिनशर्त पाठिंबा आहे का? असं त्यांनी विचारले, झी २४ तासच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

त्याचसोबत ज्या उत्तर भारतीयांना मनसेने एकदा नव्हे तर अनेकवेळा मारलं आहे मग त्यांचा पाठिंबा घ्यायला भाजपा तयार आहात? तसेच जर भाजपा जिंकली तर उद्योगधंदे गुजरातला जाणार, इथल्या भूमिपुत्रांना नोकरी मिळणार नाही यालाही मनसेचा पाठिंबा आहे का? असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला आहे.

दरम्यान, गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसाठी भाजपाला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारात पहिल्यांदाच कोकणच्या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता. उबाठा गटाकडून वारंवार उद्योगधंदे गुजरातला पळवले जातायेत असं म्हटलं जातं, परंतु २०१४ ते २०१९ आणि त्यानंतर २०१९ ते २०२२ या मागील १० वर्षाच्या काळात उद्धव ठाकरे साडे सात वर्ष सत्तेत होते. तेव्हा उद्योगधंदे बाहेर जातायेत ते का अडवले नाहीत असा सवाल राज ठाकरेंनी विचारला होता.  

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेMNSमनसेBJPभाजपाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४