शहरं
Join us  
Trending Stories
1
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
2
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
आदित्यना पाडण्यात, ठाकरेंना CM पदावरुन हटवण्यात राऊतांचा हात हे जेवढे खरे...; भाजपाचा पलटवार
5
Hardik-Natasa Divorce : हार्दिक-नताशाच्या घटस्फोटाच्या चर्चा, कृणाल पांड्याच्या फोटोवर नताशाची कमेंट; चर्चांना उधाण
6
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
7
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
8
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
9
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
10
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
11
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
12
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
13
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
14
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
15
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
16
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
17
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
18
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
19
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
20
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील

ग्राहक नसल्याने यंदाचा हंगाम गेला; आमच्यावर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:23 AM

रीना राजपूरकर यांनी मांडली व्यथा; गोकुळाष्टळी असूनही केवळ दोनच मटक्यांची विक्री

आगरदांडा : आज गोकुळाष्टमीचा दिवस असूनही सकाळपासून ग्राहक नाही, परंतु दुपारच्या दरम्यान एक-दोन मटकी विकली गेली, तर माझे सहकारी म्हसळकर यांचे एकही मटके विकले गेले नाही. या व्यवसायात मेहनत जास्त आणि कमाई कमी असते. एक मटकी बनविण्यासाठी साधारण २० रुपये खर्च होतो. मटकी तयार झाल्यावर आम्ही ही मटकी बाजारात आणून २५ रुपयांना विक्री करत असतो, परंतु ग्राहक नसल्याने यंदाचा हंगाम गेल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे, अशी व्यथा मटकी विके्रते रीना रूपेश राजपुरकर यांनी ‘लोकमत’जवळ मांडली.गोकुळाष्टमीचा सण दरवर्षी शहरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, परंतु या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी घेतल्याने त्याचा फटका मटकी विक्रे ते व कुंभारांना बसला आहे. गोकुळाष्टमीचा दिवस उजडला, तरी दहीहंडीसाठी मटकी घ्यायला मुरुड बाजारपेठेत ग्राहकांच नसल्याने या विक्रेत्यांवर उपासमारीची पाळी येणार आहे. मुरुडमधील कुंभार वाड्यात दरवर्षी दहीहंडीसाठी मडकी बनविली जातात. आज त्यांच्याकडे शेकडो मडकी तयार आहेत. मात्र, कोरोनामुळे दहीहंडी उत्सवाला बंदी असल्याने उत्सवकर्त्यांनी मटकी घेण्यासाठी पाठ फिरविल्याने मटकी विके्रत्यांना हजारो रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे. त्यामुळे राज्यसरकाराने आमच्या समाजाकडे लक्ष देऊन भरपाई द्यावी, अशी मागणी मुरुड कुंभारवाड्यातील रिना रूपेश राजपूरकर यांनी केली आहे.गोकुळाष्टमी हा उत्सव मोठ्या थाटा सर्वत्र साजरा केला जातो. मंदिरातून आरास केली जाते. रात्री १२ वाजता श्रीकृष्ण जन्म सोहळा केला जातो. भजन, पूजन, कीर्तन इत्यादी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. गोकुळाष्टमीचा उपवास हा त्या दिवशी सोडला जात नाही, तर तो दुसऱ्या दिवशी सोडतात. दुसºया दिवशी शहरात, गावा-गावांत, चौका-चौकांत दहीहंडी लावली जाते. कृष्ण नामाच्या गजरात ती फोडली जाते. आनंदोत्सव साजरा केला जातो.बाजारपेठेतील हजारो रुपयांची उलाढाल ठप्पश्रीकृष्ण जन्म उत्सवाच्या दिवशी बाजारपेठेत हजारो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र, या कोरोनामुळे सर्वांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. करोनाचे संकट असल्याने यंदा फक्त श्रीकृष्ण जन्मकाळ फक्त पाच जणांच्या उपस्थित साध्या पद्धतीने करण्याचे ठरविले आहे.दुसºया दिवशी होणारा गोपाळकाला साजरा न करण्याची संयमी भूमिका घेऊन करोनाला आळा घालू या, असे आवाहन दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष अच्युत पोतदार यांनी केले आहे. यंदा हिरमोड झाला, तरी पुढच्या वर्षी दणक्यात दहीहंडी उत्सव साजरा करू, असेही अच्युत पोतदार म्हटले आहे.

टॅग्स :Dahi Handiदहीहंडी