शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

करंजा-रेवस रो-रोमुळे जलवाहतुकीला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:52 IST

मेरिटाइम बोर्डाच्या रेवस बंदर विकास योजनेस मंजुरी

अलिबाग : महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने रेवस बंदर विकासासाठी तयार केलेल्या २५ कोटी ७ लाख रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास राज्य सरकारने मंजुरी दिली. यामुळे आता करंजा ते रेवस दरम्यान रो-रो बोट सेवा सुरू होण्यास हिरवा कंदील मिळाला आहे. रेवस येथे मरिना प्रकल्प देखील प्रस्तावित असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.बंदर विकासाच्या माध्यमातून जलप्रवासास प्राधान्य देण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारल्यावर भाऊचा धक्का (मुंबई) ते मांडवा (अलिबाग) दरम्यान प्रस्तावित रो-रो सेवेचे काम पूर्ण झाले असून ती फेब्रुवारी अखेरीस प्रत्यक्ष सुरू होणे अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. मुंबईतील भाऊचा धक्का आणि अलिबाग तालुक्यातील रेवस त्याचबरोबर करंजा ते रेवस दरम्यानची प्रवासी जलवाहतूक ही गेल्या अनेक वर्षांपासूनची आणि प्रवाशांच्या दृष्टीने मुंबई-अलिबाग दरम्यानची स्वस्त जलप्रवासी सेवा आहे. रो-रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नवी मुंबईसह, पनवेल, उरण, अलिबाग आणि मुरु ड तालुक्यातील प्रवाशांना या सेवेचा मोठा फायदा होणार आहे.राज्य शासनाच्या या मंजुरीमुळे रेवस-करंजा जलमार्गावर रो-रो सेवा सुरू होणे आता दृष्टिपथात आले आहे. या रो-रो सेवेसाठी करंजा बंदर येथे १९ कोटी रुपये खर्चाची कामे यापूर्वीच सुरू झाली. रेवस बंदरावरही कामे करण्यासाठी आवश्यक निधी आता प्राप्त झाला आहे. करंजा ते अलिबाग हे अंतर रस्त्याने ८६ किमी आहे, तर जलमार्गाने हे सागरी अंतर केवळ तीन किलोमीटर आहे. सध्या या जलमार्गावर बोट(तर) सेवेच्या माध्यमातून प्रवासी दैनंदिन प्रवासी वाहतूक होत आहे. या जलमार्गावर रो-रो सेवा सुरू करण्याचे नियोजन महाराष्टÑ मेरिटाइम बोर्डाने केले आहे.करंजा-रेवस रो-रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांसह वाहनांची देखील ये-जा करता येणार आहे. परिणामी वाहनांच्या इंधनाची मोठी बचत देखील होऊ शकणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळदेखील वाचणार आहे.केंद्र सरकारकडेनिधीसाठी प्रयत्नकरंजा-रेवस रो-रो सेवेसाठी महाराष्टÑ मेरिटाइम बोर्डाच्या रेवस बंदराकरिताच्या २५ कोटीच्या अंदाजपत्रकास राज्य सरकारने सागरमाला प्रकल्पाअंतर्गत मान्यता दिली. केंद्र सरकारकडे ५० टक्के हिश्श्याची रक्कम मिळावी यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना शासनाने मेरिटाइम बोर्डाला केली आहे. त्याच बरोबर आवश्यक त्या विभागांच्या परवानग्या घेण्याचे आदेशही दिले आहेत. रेवस बंदरावर २५ कोटी रुपये खर्चून जेट्टीचे काम, वाहनांसाठी प्लॅटफॉर्म, विद्युत पुरवठा तसेच इतर कामे नियोजित आहेत.नवी मुंबई-अलिबाग अंतर कमी होणाररेवस बंदरावरील कामांसाठी २५ कोटी खर्चाच्या प्रकल्पाला सरकारने मान्यता दिली आहे. रेवस-करंजा रो-रो सुरू झाल्यानंतर मुंबई, नवी मुंबई ते अलिबाग अंतर कमी होणार असून, इंधन व वेळेची बचत होईल. त्याचबरोबर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याबरोबरच जिल्ह्यातील पर्यटनास देखील मोठी चालना मिळणार असल्याची माहिती अलिबागचे आमदार पंडित पाटील यांनी दिली आहे.२५ कोटीच्या मंजूर प्रकल्पात कामेरो-रो सेवा अनुषंगाने जेट्टी- १५ कोटी ९० लाख ८ हजारप्लॅटफॉर्म- १ कोटी ८९ लाख ७२ हजार ४७२रेवस बंदरातील गाळ काढणे- २ कोटी ४१ लाख ३९ हजार ३९०विद्युत पुरवठा- ३४ लाख ७१ हजार ९४३इतर खर्च- २ कोटी ९ लाख ३९ हजार ८१

टॅग्स :alibaugअलिबाग