शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत भरावासाठी जेएसडब्ल्यू कं पनीला पाच कोटी ३७ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 01:58 IST

सरकारच्या प्रचलित नियमानुसार बाजारमूल्याचे दर प्रतिब्रास ४९८ रुपये इतका आहे.

- आविष्कार देसाईअलिबाग : डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील लि. कंपनीने दहा शेतकऱ्यांच्या खासगी शेतजमिनीमध्ये मातीचा भराव (राखेचा स्लॅक) करणे महागात पडले आहे. या प्रकरणी अलिबागच्या प्रांताधिकारी शारदा पोवर यांनी कंपनीला तब्बल पाच कोटी ३७ लाख ५१ हजार ६३० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तब्बल सात महिने उलटून गेली तरी अद्याप त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात प्रशासनाला यश आले नाही.मौजे शहाबाज येथील ग.नं. ६१८/०, ७९६/०, ६९७/०, ५२२/अ, ५१०/०, ७२०/०, ७१८/०, ७१७/०, ७१४/० आणि ७८८/० या मिळकतीमध्ये जेएसडब्ल्यू स्टील लि. कंपनीने कंपनीतून निघणाºया मातीचा (राखेचा स्लॅक) भराव विनापरवाना केला असल्याचे दिसून येते. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी याबाबतची तक्रार केली होती. शेतकºयांच्या तक्र ारीनुसार तसेच शहाबाज तलाठी यांच्या अहवालानुसार प्रांत कार्यालयामध्ये फौजदारी संहिता कलम १३३ नुसार ३० मार्च २०१९ रोजी सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीच्या वेळी जेएसडब्ल्यूचे प्रतिनिधी गैरहजर राहिल्याने त्यानंतरची सुनावणी ९ एप्रिल २०१९ रोजी लावण्यात आली होती. दरम्यान, प्रांताधिकाºयांनी १ एप्रिल रोजी कंपनीला दंड ठोठावण्यात आल्याची नोटीस काढली.सरकारच्या प्रचलित नियमानुसार बाजारमूल्याचे दर प्रतिब्रास ४९८ रुपये इतका आहे. मातीच्या उत्खननाची दंडाची रक्कम बाजारमूल्याच्या पाचपट म्हणजेच प्रति ब्रास २४९० होती. त्यानुसार जेएसडब्ल्यूने विनापरवाना केलेल्या एकूण २१ हजार ५८७ ब्रास मातीसाठी एकूण पाच कोटी ३७ लाख ५१ हजार ६३० इतका दंड भरण्याचे आदेश जेएसडब्ल्यू कंपनीला बजावले होते. त्यानंतर दोन सुनावण्या झाल्या आहेत. मात्र, अद्यापही कंपनीने दंडाची रक्कम भरली नसल्याचे प्रातांधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले. या प्रकाराला सर्वच अधिकारी जबाबदार आहेत. परिसरातील प्रदूषण आणि पर्यावरणाची कोणालाही चिंता नाही. शेती हा आमचा प्रमुख व्यवसाय आहे. राखेच्या प्रदूषणामुळे शेती करणे आता शक्य होत नाही. शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. जलस्रोत प्रदूषित झाल्याने पाणी पिण्यायोग्य राहिले नाही. कंपनीविरोधात यापुढे थेट फौजदारी गुन्हेच दाखल करणे गरजेचे आहे, असे शहाबाजचे ग्रामस्थ द्वारकानाथ पाटील यांनी सांगितले.जेएसडब्ल्यू कंपनीने दहा शेतकºयांच्या खासगी शेत जमिनीमध्ये बेकायदा भराव केलेला आहे. त्यामुळे जेएसडब्ल्यू कंपनीला या प्रकरणी पाच कोटी ३७ लाख ५१ हजार ६३० इतका दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अद्याप दंडाची रक्कम भरलेली नाही. या प्रकरणाच्या सुनावण्या आता पूर्ण होऊन प्रकरण निकालावर ठेवण्यात आले आहे.- शारदा पोवार,प्रांताधिकारी, अलिबाग

टॅग्स :Raigadरायगड