शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

गोंदाव आदिवासींची पाली तहसीलवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 23:04 IST

निवडणुकीवर बहिष्काराचा निर्धार; विविध मागण्यांसाठी मोर्चा

पाली : सुधागड तालुक्यातील गोंदाव आदिवासीवाडीतील ग्रामस्थ विविध प्रश्न व समस्यांच्या गर्तेत सापडले आहेत. मागील अनेक वर्षांपासून मूलभूत नागरी सेवा-सुविधांपासून वंचित आहेत. वर्षानुवर्षे मागणी करूनही प्रशासन व लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे. विविध शासन योजनांपासून वंचित राहावे लागल्याने आदिवासी समाज बांधवांच्या प्रगती व विकासाला खीळ बसली आहे. अखेर त्यांच्या संयमाचा बांध फुटला व दाखल्यांसह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी शेकडोच्या संख्येने आदिवासी बांधवांनी बुधवारी पाली तहसील कार्यालयावर मोर्चा काढला व प्रशासनाविरोधातील आपला संताप व्यक्त केला. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा एकमुखी निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला.गोंदाव आदिवासीवाडीतील आदिवासी बांधवांना स्वातंत्र्याच्या ६७ वर्षाचा काळ उलटूनही मूलभूत व पायाभूत नागरी सेवा सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. शासन योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक दाखल्यापासून आदिवासी समाज बांधव मागील अनेक वर्षांपासून वंचित राहिले आहेत. परिणामी, आदिवासी कातकरी समाजाला उत्कर्षासाठी असलेल्या योजना केवळ कागदावरच राहिल्या असल्याचा संताप उपस्थित आदिवासी कातकरी समाज बांधवांनी व्यक्त केला.लय भारी आदिवासी सामाजिक विकास संस्थेच्या कार्याध्यक्षा लता कळंबे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. लता कळंबे यांनी सुधागड तालुक्यातील आदिवासी कातकरी समाज बांधव आजही मूलभूत सुविधा व शासनाच्या महत्त्वाच्या योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. आवश्यक दाखले नसल्याने त्यांना मोठ्या अडचणी व समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आदिवासी समाज बांधवांचा सर्वांगीण विकास साधला जावा या दृष्टीने शासन योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. गोंदावसह अन्य आदिवासीवाड्या-पाड्यातील नागरिकांना लवकरात लवकर मूलभूत सुविधा देण्यात याव्यात, अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला.तसेच आदिवासी कातकरी समाज अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे यांनी सुधागड तालुक्यातील आदिवासी कातकरी समाज बांधवांची व्यथा मांडताना दऱ्याखोºयात रानावनात वसलेला समाजबांधव देशाला स्वातंत्र्य मिळूनही अजूनही पारतंत्र्यात जगत आहे. विकासाचा स्रोत वाड्या-वस्त्यात पोहोचत नाही. कष्टप्रद व हलाखीचे जीवन त्यांच्या वाट्याला आले आहे. जीवन-मरणासाठी संघर्ष करीत आहे असे म्हटले. या वेळी मोर्चात सहभागी झालेल्या महिला, पुरुष व विद्यार्थ्यांनी पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांच्यासमोर गाºहाणे मांडले. या वेळी हाडक्या वाघमारे, श्रावण वाघमारे, कुशा वाघमारे, सुरेश वाघमारे, धाकी वाघमारे, बेबी वाघमारे, मंदा वाघमारे, कुसुम वाघमारे आदीसह आदिवासी कातकरी समाज बांधव उपस्थित होते.प्रश्न सोडवण्यासाठी ५ नोव्हेंबरला बैठकया वेळी तहसीलदार रायन्नावार यांनी आदिवासी समाज बांधवांच्या समस्या समजावून घेत आचारसंहिता असून निवडणुकीची तयारी सुरू आहे. मात्र, ५ नोव्हेंबर रोजी गोंदाव आदिवासीवाडीवर सर्व शासकीय प्रमुख अधिकारी यांच्यासमवेत बैठक लावली जाईल व आदिवासी बांधवांचे प्रश्न व समस्यांची सोडवणूक केली जाईल, असे आश्वासित केले.

टॅग्स :agitationआंदोलन